शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

वावीसह अकरा गाव पाणी योजनेच्या बैठकीला ग्रामसेवकांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST

सिन्नर : वावीसह अकरा गावे पाणीपुरवठा योजनेच्या पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीस योजनेत समाविष्ट असलेल्या ग्रामसेवकांनी दांडी मारल्याने बैठकीत ...

सिन्नर : वावीसह अकरा गावे पाणीपुरवठा योजनेच्या पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीस योजनेत समाविष्ट असलेल्या ग्रामसेवकांनी दांडी मारल्याने बैठकीत ठोस निर्णय घेता आला नाही. अनुपस्थितीत ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी देत त्यांना अनुपस्थितीबाबत नोटीस काढण्यात आल्या आहेत. तालुक्याच्या अवर्षणग्रस्त वावी परिसरासाठी ही पाणी योजना संजीवनी ठरली आहे. मात्र, सध्या योजनेची वसुली पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, जलशुध्दीकरण करण्यासाठी लागणारे साहित्य आदिंसह विविध कामांसाठी पैशांची गरज आहे. योजना सुरळीत चालावी, यासाठी वावीसह अकरा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची बैठक गटविकास अधिकारी मुरकुटे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष विजय काटे व सचिव नितीन मेहेरखांब वगळता योजनेत समाविष्ट गावांपैकी एकाही गावाचे ग्रामसेवक हजर न राहिल्याने गटविकास अधिकारी मुरकुटे यांनी संबंधित ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. ग्रामसेवकांना दिलेल्या नोटीसीत मुदतीत खुलासा न केल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४चा नियम ४ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी मुरकुटे यांनी सांगितले.

---------------------------

बैठक आयोजनाच्या हेतूला हरताळ

वावीसह पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुक, वारेगाव, सायाळे, मलढोण, मिरगाव, दुशिंगवाडी, कहांडळवाडी, शहा, मीठसागरे आदी गावांना या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा कशा प्रकारे होतो व संबंधित गावांची पाणीपट्टी थकल्या कारणाने योजना चालवणे अशक्य होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास योजना बंद पडू शकते. त्यामुळे थकीत पाणीपट्टी करवसुली व पाणीपुरवठ्याचा वसुलीतील अडथळे यासंदर्भाने अध्यक्ष, सचिव व सदस्यांची आढावा बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, ग्रामसेवकांनी दांडी मारल्याने बैठक आयोजनाच्या हेतूला हरताळ फासला गेला असल्याची चर्चा आहे.

---------------------

योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्रातील टीसीएल पावडरचा साठा संपुष्टात आला आहे. कर्मचाऱ्यांचे पगारदेखील करायचे आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकांनी हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे होते. कोणीही ग्रामसेवक मुख्यालयात राहात नसल्याने कोणाही नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नांशी देणेघेणे नसल्याचे दिसते. थकीत कर तातडीने वसूल करून पाणीपुरवठा समितीकडे वर्ग करावा.

-विजय काटे, अध्यक्ष, वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा समिती