शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मोसमसह करंजाळीत विजेचा लपंडाव

By admin | Updated: December 26, 2016 02:05 IST

शेतकरी त्रस्त : वीजवितरण कंपनीचे आडमुठे धोरण

 द्याने : वीज वितरण कंपनीच्या आडमुठेपणामुळे मोसमसह करंजाळी खोऱ्यातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच परिसरात अनेक ठिकाणी जीर्ण झालेल्या वीजवाहक तारा जमिनीपर्यंत झुलत आहेत. शेतकरी व नागरिक वीज कनेक्शन घेण्याची तयारी दर्शवित असतानादेखील तांत्रिक अडचणी दाखवून वेळ मारून नेत असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त मोसम व करंजाळी खोऱ्यातील शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. दरम्यान करंजाळी येथील वीज महावितरण केंद्रातील कनिष्ठ अभियंता अमोल राजोळे यांची उचलबांगडी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.करंजाळी खोऱ्यातील निताणे, भुयाणे, बिजोटे, आखतवाडे, करंजाड, पारनेर मोसम परिसरातील आसखेडा, वाघळे, उत्राणे, राजपूरपांडे, द्याने आदि गावांमध्ये अनेक दिवसांपासून विजेच्या समस्येने ग्रासल्याने शेतकरी वैतागले आहेत. आली रे...आली, गेली रे...गेली या डोंबारी खेळामुळे बळीराजाचा मेळ काही बसत नसल्याचे सध्या चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शेकडो शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली नामपूर येथील वरिष्ठ अभियंता चरणसिंग इंगळे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर शेतात राहणारे शेतकरी विजेच्या लपंडावामुळे हैराण झाले आहेत. बल्ब आहे पण प्रकाश नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. करंजाळी व आसखेडा येथील कनिष्ठ अभियंत्यांना अनेक वेळेला शेतकऱ्यांनी भेटी घेऊन परिस्थिती सांगितली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भामरे यांनी पुन्हा एकदा मोसम परिसरातील सर्व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून कनिष्ठ अभियंता अमोल राजोळे हे ग्राहकांना व्यवस्थित मार्गदर्शन करत नसल्याचे निदर्शनास आणून दिले; मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने करंजाळी, पारनेर, निताणे, भुयाणे, बिजोटे, उत्राणे, द्याने, आखतवाडे आदि गावांतील शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच राजोळे यांची उचलबांगडी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.