शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

शिक्षण विभाग भानामतीच्या चक्रात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:15 IST

चार आठवडे उलटून माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार अतिरिक्त अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला, अद्याप त्या जागेवर कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यास शिक्षण ...

चार आठवडे उलटून माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार अतिरिक्त अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला, अद्याप त्या जागेवर कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यास शिक्षण विभागाला वेळ मिळाला नाही. एकतर सक्षम अधिकाऱ्यांची कमतरता असावी किंवा शिक्षण विभागाला वाटत असलेली कमतरता ‘भरून’ देण्याची सक्षमता दाखविण्यासाठी कोणी पुढे येत नसावे. त्यामुळे ही नियुक्ती रखडली. त्यातून शैक्षणिक नुकसान फारसे होत नसले तरी, शिक्षक-शिक्षकेतरांच्या वेतनावर गंडांतर मात्र निश्चित आले आहे. ते काम करण्यासाठी प्रभारी अधिकारी नेमले तर त्यांनी देखील माध्यमिक शिक्षण विभागातील दररोजच्या गैरप्रकार, भ्रष्टाचाराच्या तक्रारींनी त्रस्त होऊन काम करण्यास नकार दिला आहे. तर, दुसरीकडे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनीही एक महिन्याच्या दीर्घ मुदतीच्या रजेवर जाणे पसंद केले आहे. राज्य सरकार शाळा सुरू करण्याच्या विचारात असताना शिक्षणाधिकाऱ्याने रजेवर जाण्याचा निर्णय साहजिकच सहजासहजी घेतलेला नसावा, जर कठीण परिस्थितीत हा निर्णय घेतला असला तर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याचा कारभारही प्रभारीकडे देण्यात येईल.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला ग्रहण लागल्यागत परिस्थिती सध्या दिसू लागली आहे, हे भावी पिढीच्या दृष्टीने घातक ठरू शकते. मात्र, इतका गंभीर विचार करण्याच्या भानगडीत ना प्रशासन पडेल, ना जिल्हा परिषदेचे कारभारी. त्यामुळे त्याचा विचार भावी पिढीवर अवलंबून असलेले करतील. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांनी रजेवर जाण्यावरून जी काही चर्चा होत आहे, ती खचितच योग्य नाही. पंचायत राज समितीने शिक्षण विभागाचे पुराव्यासकट काढलेले वाभाडे व त्यातून प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची नामुष्की ओढवली. शिक्षण विभागातच हे घडते असे नाही, प्रत्येक विभागातीलच कर्मचारी, अधिकारी मुख्यालयी राहतात असे नाही, काहींचे मुख्यालयी राहून कार्यालयात शासकीय कामकाज करणे अपेक्षित असताना महिनोन्महिने कार्यालयाचे तोंडही न पाहणारेही अनेक आहेत. मात्र असे महाभाग आजवर कधीच समोर आले नाहीत, किंबहुना त्यांना उघडे पाडण्याचा प्रयत्न झाला नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी जरा अधिकच ती बाब मनावर घेतली. परिणामी त्यांना रजेवर जाण्यास भाग पडावे लागले. एखाद्या भानामतीने भारावून टाकावे, तसा शिक्षण विभागावर काळी जादू झाल्यागत गेल्या महिन्यापासून परिस्थिती ओढवली आहे. श्रावण महिना तसाही धार्मिकदृष्ट्या पवित्र व महत्त्वाचा मानला गेला आहे, त्यातच हे सारे व्हावे, तसे अनाकलनीयच.

-श्याम बागुल