शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

द्वारका ते नाशिक रोड रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST

शहराच्या मध्यवस्तीत द्वारका चौक असून या चौकात मुंबई - आग्रा रोड आणि नाशिक - पुणे या दोन महामार्गांचा संगम ...

शहराच्या मध्यवस्तीत द्वारका चौक असून या चौकात मुंबई - आग्रा रोड आणि नाशिक - पुणे या दोन महामार्गांचा संगम आहे. द्वारका येथून पुणेकडे जाणाऱ्या महामार्गावरून नाशिक रोड, सिन्नर, शिर्डीकडे मोठ्या प्रमाणावर वाहने जातात. शहरातील सर्वांत दाट वाहतुकीचा हा रस्ता आहे. परिणामी, द्वारका चौक ते दत्तमंदिर सिग्नल यादरम्यानचा वाहतुकीची सतत कोंडी होत असते. द्वारका चौकात वाहतुकीची सतत कोंडी होत असल्याने मुंबई आणि आग्ऱ्याकडे नाशिक - पुणे महामार्गावरील जाणारी वाहतूकही सतत विस्कळीत होत असते. द्वारका चौकासह बोधलेनगर, गांधीनगर, उपनगर, नेहरूनगर परिसरातील वाहतुकीची कोंडी कायमची सुटावी, यासाठी द्वारका ते दत्तमंदिर चौकापर्यंत थेट उड्डाणपूल उभारण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. त्याला रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वत: मान्यता देऊन सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यानच्या काळात द्वारका - दत्तमंदिर उड्डाणपुलाच्या कामाचा सविस्तर अहवालदेखील तयार करण्यात आला होता. मात्र, सदर रस्ता हा महानगरपालिका हद्दीत येत असल्याने कामासाठी निधी कोण देणार, हा तांत्रिक मुद्दा निर्माण झाला होता. मनपाचे आर्थिक बजेट कमी असल्याने मनपाकडून या कामासाठी निधी मिळणे शक्य नव्हते. रस्ता मनपा हद्दीत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी हात वर केले होते. यातून मार्ग काढण्यासाठी खा. हेमंत गोडसे यांनी दिल्ली दरबारी प्रयत्न केले. सदर सहा किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्गीकरण करून निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी पाठपुरावा सुरू केला असता, प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत द्वारका - दत्तमंदिर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्गीकरण करण्याची शिफारस रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे केली आहे.