शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

मागील वर्षाच्या दुप्पट पावसाची हजेरी

By admin | Updated: July 12, 2016 00:54 IST

१२६ मिलिमीटरची नोंद : जिल्ह्यातील धरणांमध्ये २४ टक्के पाणीसाठा

 नाशिक : शहरात गेल्या ३६ तासांपासून सलग सुरू असलेल्या पावसाने सोमवारी (दि. ११) दुपारनंतर काही वेळ विश्रांती घेतली. मात्र दुपारनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत १८९९ मिलिमीटर पाऊस झाला असून, त्याची सरासरी १२६ मिलिमीटर इतकी आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यातील पावसाची सरासरी १५४ असताना प्रत्यक्षात यावर्षी आतापर्यंत ३५३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत १६६ मिलिमीटर पावसाची नोेंद करण्यात आली होती.रविवारी गोदावरी नदीत २२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. इगतपुरी येथील तरंगपाडा पिंप्री येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या २० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नाशिक तालुक्यात ६१ टक्के, बागलाण तालुक्यात ५४, सिन्नर ५१, तालुक्यात सर्वांत कमी पावसाची नोंद मालेगाव २२.५ आणि पेठ येथे २५.५ टक्के झाली आहे. जिल्ह्णात एकूण ३२.८७ टक्के पावसाची नोेंद करण्यात आली आहे. संततधारेमुळे धरणाच्या पाणीसाठ्यातदेखील लक्षणीय वाढ झाली आहे. गंगापूर धरणात ४७ टक्के, तर दारणा धरणात ६६ टक्के पाणीसाठा सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झाला होता. पालखेडमध्ये ७७ टक्के पाणीसाठा झाला असून १९ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दारणातून ९१७५ तर नांदूरमधमेश्वरमधून ३५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याशिवाय गोदावरी डावा व उजव्या कालव्यातून प्रत्येकी १५० क्यूसेक पाणी सोडले आहे. पालखेड डाव्या कालव्यातून ६०० क्यूसेक पाणी सोडले आहे. त्याचा फायदा मनमाड, मनमाड रेल्वे, येवला नगरपालिका आणि ३८ गावे पाणीपुरवठा योजनेस होणार आहे. जिल्ह्णातील सर्व धरणांत प्रकल्प क्षमतेच्या २४ टक्के पाणीसाठा झाला आहे. सोमवारी सकाळनंतरही पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे बोलले जाते. दुपारनंतर पावसाने काही वेळ उघडीप घेतली. दोन वाजेनंतर पावसाची अधूनमधून संततधार सुरूच होती. (प्रतिनिधी)