शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात जाणवू लागली पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2016 00:29 IST

येवल्यात जाणवू लागली पाणीटंचाई

येवला : येवला शहरास तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, १२ दिवस होऊन गेले तरी गंगादरवाजासह चौंडेश्वरी मंदिर परिसरात पाणी आले नसल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. सध्या गंगादरवाजा भागात असणाऱ्या खासगी कूपनलिका व चौंडेश्वरी मंदिराजवळ असलेली पालिकेच्या मालकीची विहीर परिसरातील नागरिकांची तहान भागवत आहे. गंगादरवाजा भागात १० ते १२ खासगी कूपनलिका आहेत. त्यावरून नागरिक पाणी भरून नेत आहेत. मधली गल्ली परिसरातील चौंडेश्वरी मंदिराजवळ जुनी विहीर आहे. या विहिरीवर परिसरातील नागरिक अवलंबून आहेत. पाणीटंचाईच्या काळातदेखील या विहिरीच्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना फार टंचाई जाणवली नाही. या विहिरीवर पालिकेने दोन विजेचे पंप बसविलेले आहेत. या दोन कनेक्शनमधून दोन हजार लिटरची पाण्याची टाकी भरली जाते. यातून आवश्यकतेनुसार पाणी नळाद्वारे घेतले जाते. शिवाय काही मंडळींनी विहिरीतून थेट पाईप कनेक्शनने पाणी घरापर्यंत नेल्याची माहिती आहे. या भागातील पाणीटंचाई निवारण्यास ही विहीर समर्थ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. वापरण्यायोग्य पाणी आहे, परंतु पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. अशीच परिस्थिती सर्वदूर शहरामध्ये आहे. शहराच्या मध्य वस्तीत, पाटीलवाडा, कुक्कर गल्ली, खंडेराव मंदिर परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. नागरिकांना पाणी भरण्यासाठी खड्डे चुकवत महादेव मंदिरासमोरील हातपंपाचा आसरा घ्यावा लागत आहे. (वार्ताहर)