शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

वनखात्याच्या आडमुठेपणामुळे संपूर्ण गाव अंधारात

By admin | Updated: August 13, 2015 00:01 IST

वर्षभरापासून सामग्री पडून : ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत

नाशिक : ग्रुप ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या पाड्यात शासनाच्या इतर सोयी-सुविधा पुरविल्या जात असतानाच निव्वळ वन खात्याच्या आडमुठेपणामुळे सुरगाणा तालुक्यातील ठाणापाडा (हातगड) हे सुमारे तीनशे लोकवस्तीचे गाव गेल्या पन्नास वर्षांपासून अंधारात आहे. वाडी-वस्ती विद्युतीकरणाचा भाग म्हणून या गावात विजेसाठी सर्व सामग्री येऊन पडलेली असताना वनखात्याच्या हद्दीत विजेचे खांब उभे करण्यास मज्जाव केला जात असल्याने गावाला अंधारात चाचपडावे लागत आहे. विशेष म्हणजे ठाणापाडा ग्रामस्थांनी वन हक्क कायद्यान्वये सामूहिक दावाही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करून त्याबाबतची सारी पूर्तता करून दिली आहे. परंतु अशा प्रकारचा दावा करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने येत्या काही दिवसात संपूर्ण गावानेच उपोषण, आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. हातगड ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या ठाणापाडा येथे ६४ उंबरे असून, साधारणत: तीनशे कुटुंबे राहतात. परंतु आजवर या पाड्यात वीज पोहोचू शकलेली नाही, त्यामुळे अंधारातच वाटचाल करणाऱ्या या पाड्यातील ग्रामस्थांनी शासन दरबारी पाठपुरावा करून वीज मंजूर करून घेतली खरी, मात्र गावात विजेचे पोल टाकण्यासाठी वन खात्याच्या जमिनीचा वापर करावा लागतो व वन खाते त्यास नकार देत आहे. पाड्याच्या हद्दीपर्यंत विजेचे रोहीत्र तसेच लोखंडी पोल व तारा वर्षभरापासून येऊन पडल्या आहेत तसेच हद्दीपर्यंत वीज जोडणीही पूर्ण झालेली आहे. परंतु वन खात्याच्या हद्दीत पोल उभारता येणार नाही अशी भूमिका घेण्यात आल्याने संपूर्ण गावालाच अंधार कोठडीत राहावे लागत आहे. पाड्याच्या वापरासाठी वन हक्क कायद्यान्वये जागा मिळावी अशी विनंती व प्रस्ताव ग्रामस्थांनी सादर केलेला असतानाही त्यालाही मंजुरी मिळत नाही. पाड्यावर वीज नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, एकतर वन खात्याने सामूहिक दावा मान्य करावा किंवा वीज पोल टाकण्याची अनुमती द्यावी अशी मागणी जिवला गवळी, नारायण गावीत, रामचंद्र पिठे, साहेबराव पवार, आदि ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे.