शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात टंचाईमुळे पुनंदचे पाणी सोडा

By admin | Updated: April 7, 2017 23:24 IST

कळवण : पाणीप्रश्नाची सोडवणूक करावी, अशी मागणी पुनंद खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 कळवण : तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, पुनंद प्रकल्पाचे पाणी पुनंद नदीपात्रात, सुळे डावा व उजव्या कालव्यात पाणी सोडून पाणीप्रश्नाची सोडवणूक करावी, अशी मागणी पुनंद खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यंदा पावसाळा जास्त होऊनही विहिरींनी लवकर तळ गाठला आहे. त्यामुळे कळवण तालुक्यातील पुनंद प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी भागातील गावांसह पुनंद खोऱ्यात म्हणजे दह्याने दिगर, दरेभणगी, मोकभणगी, भादवण, पिळकोस, सुळे, धार्डे दिगर, नाळीद, देसराणे, रवळजी, खेडगाव, विसापूर, गणोरे, ककाणे आदिंसह परिसरातील गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जनावरांबरोबर नागरिकांनाही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अशी परिस्थिती उद्भवल्याने भविष्यात मे, जून महिन्यात याचा त्रास सहन करावा लागणार आहे. पुनंद खोऱ्यातील ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीचा व ग्रामसभेचा ठरावही निवेदनासोबत जोडण्यात आला आहे. तसेच सहायक जिल्हाधिकारी गंगाथरण डी., तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांचा पाणी सोडण्याबाबत सकारात्मक अहवाल जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना देण्यात आला. शिष्टमंडळात कळवण पंचायत समिती सदस्य लालाजी ठाकरे, पंचायत समिती सदस्य केदा ठाकरे, मोकभणगीचे उपसरपंच संजय शेवाळे, भास्कर भालेराव, बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे, अविनाश शेवाळे, कौतिक गांगुर्डे, राजेंद्र शेवाळे आदि उपस्थित होते.आदिवासी बांधवांनी जायचे कुठे?कळवण तालुक्यातील पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सुपले, शेरी, भैताने, सावरपाडा, चिंचपाडा, पिंपळे, दह्याने, गणोरे, सुळे, लखानी, जयदर, खडकी, प्रतापनगर या धरणाच्या काठाशी असलेल्या गावांमध्ये सध्या पाणीटंचाई जाणवू लागल्याने ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी परिस्थिती आदिवासी बांधवांची झाली आहे. उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने आदिवासी बांधवांनी पाण्यासाठी जायचे तरी कुठे, असा सवाल आदिवासी बांधवांनी केला आहे.अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पात या भागातील आदिवासी बांधव व त्यांचे नातेवाईक, सगेसोयरे यांच्या जमिनी संपादित करून शासनाने प्रकल्प व त्याअंतर्गत कालवे बांधले. ज्या आदिवासी बांधवांच्या जमिनी गेल्या त्यांनाच आज पाण्यासाठी शासन व यंत्रणेच्या विनवण्या कराव्या लागत असून, या प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी आदिवासी बांधवांना अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची परिस्थिती कळवण या पाण्याच्या सुजलाम सुफलाम आगारात निर्माण झाल्याची शोकांतिका आहे. यापूर्वी पाण्याची टंचाई निर्माण झाल्यावर प्रकल्पातून पाणी मिळत होते. आता मात्र परिस्थिती बदलल्याने पाणीटंचाईचा मुकाबला करावा लागत असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. धरण उशाशी असूनसुद्धा पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आदिवासी भागात दिसून येत आहे. पुनंद प्रकल्पातील पाण्यावर कळवण तालुक्याच्या लाभक्षेत्रातील जनतेचा प्रथम अधिकार असून, जनतेला शासन व यंत्रणेने प्रथम पाणी उपलब्ध करून द्यावे व नंतर पाण्यावर इतरांचा अधिकार ठेवून आरक्षण करावे, अशी मागणी कळवण तालुक्यातील जनतेने केली आहे. (वार्ताहर)