शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

आयात शुल्कामुळे गहू, डाळींचे दर वाढण्याचे संकेत

By admin | Updated: March 30, 2017 00:42 IST

नाशिक : यावर्षी गहू, तांदूळ व डाळींचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असून, नवे पीक दाखल होताच घाऊक बाजारातील दर काहीअंशी कमी झाले असल्याने वर्षासाठी अन्नधान्य साठवण्याचे नियोजन सुरू आहे.

नाशिक : यावर्षी गहू, तांदूळ व डाळींचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असून, नवे पीक दाखल होताच घाऊक बाजारातील दर काहीअंशी कमी झाले असल्याने नाशिककरांनी संपूर्ण वर्षासाठी अन्नधान्य साठवण्याचे नियोजन सुरू केले आहे. यंदा पीक उत्पादन वाढल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांना हमीभावही मिळत नसल्याने केंद्र सरकारने गहू आणि तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे येत्या काळात गव्हासह डाळींच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याने नागरिक वर्षभरासाठी आवश्यक असलेले गहू, तांदूळ, डाळी साठविण्याचे नियोजन करीत आहेत.  गेल्या वर्षी सप्टेंबर, आॅक्टोबर या महिन्यांच्या कालावधीत डाळींचे भाव गगनाला भिडले होते. तूर डाळ तर दोनशे रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊन पोहोचली होती. त्यामुळे यंदा खबरदारीचा पर्याय म्हणून अनेकजण वर्षभरासाठी डाळींच्या किमती कमी असल्याने त्या साठवून ठेण्याच्या पवित्र्यात आहेत. उन्हाळ्यात वडे, पापडा यांसारखे वाळवणाचे पदार्थ करण्यासाठी हरभरा डाळ व उडीद डाळीचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. शेवया, कुरडयांसाठी विशेष गव्हाची ग्राहकांकडून खरेदी होत आहे. तर वर्षाच्या गरजेसाठी शरबती आणि लोकवण गव्हाला नागरिकांची अधिक पसंती आहे. अनेकजण महाराष्ट्रातच उत्पादित होणारा अजित १०२ व मोहन वंडर गव्हाची खरेदी करीत आहे. यंत्राद्वारे कापणी करून काढलेल्या व चाळण के लेल्या गव्हाला नाशिककरांची अधिक मागणी असल्याचे दुकानदार सांगतात. (प्रतिनिधी)नाशिकमध्ये जिल्ह्यातून इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वरसह विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदीया या भागातून तांदूळ येतो. सोबतच मध्य प्रदेश व छत्तीसगढ येथूनही येणाऱ्या तांदळालाही चांगली मागणी आहे. पारंपरिक कोळपी तांदळाला चांगली मागणी असून, इंद्रायणीलाही चांगला ग्राहक आहे. यावर्षी गहू आणि तांदूळ यांच्या भावामध्ये फारसा चढ- उतार झालेला नाही.- प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना, नाशिकनाशिकमध्ये मध्य प्रदेशमधून गहू येतो. यात शरबती गव्हासह लोकवण गव्हाला चांगली मागणी आहे. महाराष्ट्रात उत्पादित होणारा अजित १०२ व मोहन वंडर गव्हाला मागणी आहे. ग्राहक यंत्राने काढलेला गहू खरेदी करण्याला पसंती देतात. त्यासाठी दर वाढवून देण्याचीही ग्राहकांची तयारी असते. असा गहू साधारण गव्हापेक्षा ५० ते १०० रुपये महाग आहे. यावर्षी अन्नधान्याचे दर स्थिर असले तरी सरकारने १० टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मार्च अखेरमुळे व्यवहारही मंदावलेले असल्याने खरेदी-विक्री आणि महागाईविषयीचे चित्र स्पष्ट होण्यास आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. - अशिष पगारिया, व्यापारी, नाशिक