शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच जिल्ह्यात पावणेदोन लाख कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शासकीय आणि खासगी सेवेतील १८ हजारांहून अधिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन ...

नाशिक : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शासकीय आणि खासगी सेवेतील १८ हजारांहून अधिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच सुमारे पावणेदोन लाख बाधित कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतण्याची किमया घडली आहे. वर्षभरातील कोरोना थैमानाच्या काळातही या आरोग्य योद्ध्यांनी दिलेले योगदानच जिल्ह्यातील मृत्युसंख्या काहीशी कमी करण्यात कारणीभूत ठरली आहे.

जिल्ह्यात कार्यरत असलेले जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, खासगी दवाखाने, रुग्णालये, मल्टी नॅशनल कंपन्यांची हॉस्पिटल्समधील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गत वर्षभरापासून अव्याहतपणे दिलेली सेवाच जिल्ह्यात काही प्रमाणात तरी कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर जिथे कुटुंबातील माणसांकडूनदेखील कुटुंबातील दुसऱ्या बाधिताशी संपर्क साधला जात नव्हता, अशा काळातही याच आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपापले कर्तव्य बजावले. बहुतांश रुग्णालयांमधले प्रमुख डॉक्टर्स, सहायक डॉक्टर्स, शिकाऊ डॉक्टर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, नर्स, वॉर्डबॉय, सहायक आरोग्य कर्मचारी अशा सर्वांना कोरोनाची बाधा झाली. मात्र, त्या बाधेलादेखील न घाबरता औषधोपचार घेऊन बरे झाल्यानंतर तेच डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी पुन्हा बाधित नागरिकांच्या सेवेत दाखल झाले. अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांचे घर लहान असल्याने आपल्यामुळे कुटुंबातील इतरांना बाधा नको म्हणून दोन-दोन महिने घरापासून लांब राहून कार्यरत रहावे लागले. तर काहींच्या कुटुंबात या आरोग्य कर्मचाऱ्यांमुळेच कोरोनाची बाधा झाल्याचे प्रकारदेखील घडले. तरीदेखील न डगमगता या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्याला आणि कोरोनाला पळवून लावण्याच्या लढाईत कार्यरत राहण्याला प्राधान्य दिले. त्यामुळेच जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन लाख नागरिक बरे होऊन आपापल्या घरी आणि कोरोनाविरोधी लढाईत पुन्हा सक्रिय होऊ शकले. या संपूर्ण काळात काही आरोग्य सेवकांना अनेक ठिकाणी कटू प्रसंगांचादेखील सामना करावा लागला. मात्र, तरीदेखील त्या प्रसंगातील कटुता मनात न ठेवता किंवा त्या घटनांचा रुग्णसेवेच्या कामकाजावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. त्यामुळेच इतके मोठे यश जिल्ह्यातील आरोग्य विभागाला लाभू शकले आहे.

कोट

जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वर्षभर अथक मेहनत घेतली. जीवावर उदार होऊन कोरोनासारख्या अज्ञात संकटाशी वर्षभर दोन हात केले असून, ही लढाई कोरोना नामशेष होईपर्यंत अशीच सुरू राहणार आहे. सध्याची परिस्थिती बिकट असली तरी त्यावरही सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातूनच मात केली जाईल, असा विश्वास वाटतो.

डॉ. निखिल सैंदाणे, घटना व्यवस्थापक, जिल्हा रुग्णालय

-------------------

स्लग - जागतिक आरोग्य दिन विशेष