शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कोरोनामुळे हरिनाम सप्ताहाची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:00 IST

सचिन सांगळे । सिन्नर : वारकरी सांप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेत राज्यातील गावागावांमध्ये सुरू असलेली अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक ...

ठळक मुद्देकीर्तनकार घरात : सोशल मीडियाद्वारे प्रबोधनावर भर

सचिन सांगळे ।सिन्नर : वारकरी सांप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेत राज्यातील गावागावांमध्ये सुरू असलेली अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक वर्षांची परंपरा यंदा कोरोनाच्या संकटामुळे खंडित झाली आहे. कीर्तन-प्रवचनकार घरी असून, त्यांनी स्वत:ला शेती आणि घरकामात गुंतवून घेतले आहे. अनेक कीर्तनकार, प्रवचनकार हे सोशल मीडियाद्वारे आपली कीर्तने-प्रवचन सेवा देत आहेत. अनेकांची प्रवचने फेसबुकवरही सध्या लाइव्ह सुरू आहेत.फाल्गुन आणि चैत्र या महिन्यांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह, जत्रा, यात्रा, मेळावा, उत्सव मोठ्या प्रमाणावर असतात. या काळात गावोगावी हरिनाम सप्ताहाची संख्याही मोठी असते. कीर्तनकार-प्रवचनकार व्यस्त राहतात. यंदा मात्र कोरोनाच्या जीवघेण्या साथरोगामुळे १४ एप्रिलपर्यंत देशात व राज्यात सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. गर्दी टाळण्यासाठी कीर्तनकारांनी कुठेही कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या सिन्नर तालुक्यात छोटे-मोठे १०० ते १२५ प्रवचनकार व कीर्तनकार आहेत. वेगवेगळ्या तारखांंना असलेले हरिनाम सप्ताह काकड आरती, गाथा पारायण व भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तने, गाव पंक्ती असे दिनक्र म असतात. ग्रामीण भागात आख्खे गावच या काळात भक्तिरसात न्हाऊन निघते. तालुक्यातील कीर्तनकार बाहेर जातात आणि दूरवरचे कीर्तनकार सेवेसाठी गावी येतात. काही कीर्तनकार कोरोनाबाबत स्थानिकांचे प्रबोधन करीत आहेत. हरिनाम सप्ताहाची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी काही गावांमध्ये सप्ताह कालावधीत केवळ एकच विणेकरी मंदिरात उभा राहून अखंड नाम घेणार आहे. इतर सर्व कार्यक्र म रद्द केले आहेत. शासनाच्या आदेशाचे पालन करीत असल्याचे सर्व कीर्तनकार सांगत आहेत.सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील रेणुकामाता मंदिरात सालाबादप्रमाणे यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाचे ४२ वे वर्षे होते. सप्ताह काळात येथे राज्यातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार सेवा देतात. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर येथील सप्ताह स्थगित करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावात अखंडपणे सुरू असलेल्या भजनाच्या परंपरेत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खंड पडला आहे. तसेच दररोज पहाटे होणारा काकडाही बंद झाला आहे. येथील भजनी मंडळाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला मंदिरात भजन कार्यक्र माची सेवा सुरु होती. यावर्षी संपूर्ण जगात व भारतात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे तसेच लॉकडाउनमुळे मंदिरेसुद्धा बंद असल्याने ही सेवा खंडित झाली आहे.

सरकारच्या सोबत आम्ही सर्व वारकरी आहोत. सर्व नागरिकांनी आपले आरोग्य सांभाळावे. कोरोनाचे संकट लवकर दूर कर असे साकडे आम्ही पांडुरंगाकडे घालत आहोत. सध्या आम्ही बहुतांशी कीर्तनकारांनी स्वत:ला शेतात आणि कुटुंबात अडकून घेतले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कीर्तनसेवा बंद ठेवली आहे.- ह.भ.प. कैलास महाराज तांबे, तालुका अध्यक्ष, वारकरी संघटना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReligious programmeधार्मिक कार्यक्रम