शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

डॉ. तात्याराव लहाने यांनी आजार टाळण्याचे सूत्रच उलगडून दाखवले

By admin | Updated: May 25, 2015 01:53 IST

डॉ. तात्याराव लहाने यांनी आजार टाळण्याचे सूत्रच उलगडून दाखवले

नाशिक : पिण्याच्या पाण्याचे प्रमाण, सकाळच्या नाश्त्यापासून ते जेवणाच्या वेळा, व्यायामाची महत्त्व यांसारख्या अनेक मुद्द्यांना स्पर्श करीत मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी आजार टाळण्याचे सूत्रच उलगडून दाखवले. शिवाय सध्याच्या जीवनपद्धतीवर टीका करीत श्रोत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनही घातले. नाशिक वसंत व्याख्यानमालेचे स्व. शांतारामबापू वावरे स्मृतिप्रीत्यर्थ चोविसावे पुष्प गुंफताना ‘आजार कसे टाळावेत?’ या विषयावर डॉ. लहाने बोलत होते. ते म्हणाले, रोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे. बाटलीने पाणी न पिता पेल्याने हळूहळू प्यावे. संपूर्ण पोटभर कधीच जेऊ नये. कमी जेवण केले तरच अन्नाचे पचन होते व आजार टाळता येतात. एकदाच भरपेट जेवणे चुकीचे असून, त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. रात्री पोटभर जेवल्यामुळे मधुमेहाची शक्यता वाढते. रात्री लवकर जेवावे व झोपताना एखादे फळ, बिस्किट खाऊन झोपावे. रात्री जेवल्यानंतर शतपावली करणे गरजेचे आहे. अन्न पोटात ठेवून झोपणे हे आजाराला निमंत्रण देण्यासारखेच आहे. आहारात चमचमीत पदार्थांचा समावेश नसावा. त्यातून कोलेस्टेरॉल वाढते व हृदयविकार, मधुमेह उद्भवतो. सकाळी अवश्य डाळ खावी. रात्री मात्र तिचे प्रमाण कमी ठेवावे. कोणतेही तूप रोज भरपूर खाणे हे रोज मटण खाण्यासारखेच आहे. बहुतेकांच्या सकाळच्या नाश्त्यात तळलेल्या पदार्थांचा समावेश असतो. हेदेखील आजाराचे मुख्य कारण असते. तळलेले पदार्थ आठवड्यातून एकदा-दोनदा दुपारच्या जेवणात सेवन करावेत. ज्यांच्या पोटाचा घेर ३० इंचांपेक्षा अधिक असतो, त्यांना मधुमेह झालेला असतो वा तो होण्याचा धोका अधिक असतो. वाढलेले पोट ही ‘शुगर फॅक्टरी’ असल्याचा इशारा त्यांनी दिला. रोज किमान चालण्याचा व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. जीवनशैलीतील व आहारातील हे बदल अमलात आणणे फार कठीण नसते; मात्र आपली इच्छाशक्ती कमी पडते, असेही ते म्हणाले. ‘खा पिझ्झा बर्गर, व्हा आजाराने जर्जर... खा भाकरी-भाजी, जगा होईतो आजोबा-आजी’ या डॉ. लहाने यांनी सादर केलेल्या घोषवाक्याला उपस्थितांनी दाद दिली.श्रीकांत बेणी यांनी डॉ. लहाने यांचा परिचय करून दिला. संगीता बाफना यांनी शांतारामबापू वावरे यांच्या कार्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)