शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी केली धर्माची चिकित्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST

नाशिक : डॉ. आंबेडकरांनी बुद्ध आणि कबीरानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरू मानले होते. त्याचे मुख्य कारण ...

नाशिक : डॉ. आंबेडकरांनी बुद्ध आणि कबीरानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरू मानले होते. त्याचे मुख्य कारण बुद्ध आणि कबीराप्रमाणे येणाऱ्या धर्मव्यवस्थेला फुले यांनी आव्हान दिले होते. बुद्धाने सांगितले होते की, सत्याची, धर्माची चिकित्सा करा. धर्म हा माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. तसेच ज्या गोष्टी अनुभवास येत नाहीत, ज्यांची पडताळणी करता येत नाही किवा ज्यांच्या अस्तित्वाचा पुरावा नाही त्यांना सत्य मानू नका. असे विचार प्रसिद्ध लेखक व विचारवंत, माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित केलेल्या महात्मा फुले व डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती समारंभानिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, यज्ञ, वेद, आत्मा, परमात्मा,पुनर्जन्म या साऱ्या धार्मिक संकल्पनांविरुद्ध फुले, आंबेडकरानी बंड उभे केले. फुले महान बंडखोर आहेत. म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी त्यांना गुरू मानले होते. हजारो वर्षांच्या इतिहासात स्त्री, शुद्र, शेतकरी यांच्यासाठी कुणीही आंदोलने केली नाहीत. तसेच धार्मिक, सांस्कृतिक सत्तेला प्रश्न विचारले नाहीत. हे काम फुले यांनी केले. म्हणूनच त्यांना जनतेने महात्मा ही पदवी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य सचिव प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन कार्याध्यक्ष संजय करंजकर व प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. परिचय वसंत खैरनार यांनी करून दिला. ॲड. अभिजित बगदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी केले.

इन्फो

देशाच्या नवनिर्माणातील योगदान

भारतात अस्पृश्यांसाठी आणि मुलींसाठी महात्मा फुले यांनी प्रथम शाळा काढण्याचे धाडसाचे काम केले. डॉ. आंबेडकरांनी आपले शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक धोरण फुलेंच्या कार्य आणि कर्तृत्वाकडे पाहूनच ठरवले. त्यांनी सामाजिक क्रांतीला, राजकीय स्वातंत्र्याला अधिक महत्व दिले. दोघांची कामे परस्परांना पूरक राहिली. एवढेच नव्हे तर घटनेत स्त्रियांचे, दलितांचे हक्क अबाधित कसे राहतील हे डॉ. आंबेडकर यांनी पाहिले. वाघ यांनी फुले, आंबेडकर यांच्या देशाच्या नवनिर्माण कामातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींकडे लक्ष वेधले.

फोटो