शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

सटाण्यात दुभाजकच अपघाताना कारणीभूत

By admin | Updated: May 14, 2016 22:21 IST

लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचा जावईशोध : लाखो रुपये खर्चून बांधलेले दुभाजक हटविण्याचे काम सुरू

 सटाणा : शहरातून जाणारा विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील अतिक्रमण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वारंवार अपघात होऊन हा रस्ता अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. सुमारे साठच्या वर निष्पाप बळी गेले तर शेकडो विकलांग झाले. दुर्घटना घडली की फक्त बायपासचा विषय चर्चिला जातो. मंगळवारच्या दुर्घटनेने हेच सिद्ध झाले. जनप्रक्षोभ पाहून आमदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांसमोर तावातावाने बैठक घेऊन या बैठकीत होणाऱ्या दुर्घटनांना रस्ता दुभाजक कारणीभूत असल्याचा जावईशोध लावला. वाहतूक सुरळीत असावी हा मुख्य उद्देश ठेवून नाशिक नाका ते ताहाराबाद नाकादरम्यान लाखो रु पये खर्चून बांधलेले रस्ता दुभाजक काढण्याचे फर्मान सोडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग हा सटाणा शहरातून जातो. हा मार्ग गुजरात राज्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्यामुळे साहजिकच वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. मात्र शहरातून जाणाऱ्या या मार्गावर पक्की अतिक्रमणे आणि राजकारण्यांच्या वरदहस्तामुळे टपरीदादांनी निर्माण केलेले हातगाडी आणि टपरींचे अतिक्रमण यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघातांना निमंत्रण मिळत असते.गेल्या सात वर्षांपूर्वी या रस्त्याची कोंडी दूर करण्यासाठी बांधकाम विभागाने जिजामाता उद्यान ते ताहाराबाद नाका हा रस्ता सुशोभीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. (वार्ताहर)