शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

काळजी नको, दक्षता घ्यावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:13 IST

नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना जे नागरिक पुरेशी काळजी घेत आहेत, त्यांनी काळजी करण्याची ...

नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना जे नागरिक पुरेशी काळजी घेत आहेत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. केवळ सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून दक्षता घ्यावी.

या बिकट काळात आरोग्यदायी जीवनशैली हाच बचावाचा खरा मंत्र आहे. आरोग्याच्या दृष्टीने हितकर असणारी प्रत्येक गोष्ट करण्याला प्राधान्य देणे नितांत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला जीममध्ये जाणे शक्य नसले तरी घरीच किमान अर्धा ते एक तास व्यायाम करावा. केवळ घरात बनवलेल्या पदार्थांचे सेवन करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच शीतपेये, थंड खाद्यपदार्थ पूर्णपणे वर्ज्य केल्यास शरीराला बाहेरून होऊ शकणाऱ्या धोक्याची शक्यता आपसूकच कमी होते. कोराेनाच्या या संकटाचा सामना सर्व आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांना एकत्रितपणे करायचा असल्याचे भान प्रत्येकाने ठेवावे. तसेच या आजाराबाबत भीती बाळगू नये. घरात राहणाऱ्यांनी प्रसन्न मन ठेवावे. तसेच केवळ उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्यांनीच घराबाहेर पडावे. वडीलधारे आणि बालकांना सध्या घराबाहेर पाठवणे बंद करावे. आजारासारखी काही लक्षणे भासली तरी चाचणी करणे टाळू नका. त्यामुळे आजार बरा न होता, अजून वाढतो. तसेच त्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यदेखील बाधित होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तत्काळ चाचणी आणि बाधित असल्याचे समजल्यावर तत्काळ उपचार हाच त्यावरील उपाय आहे. या परिस्थितीत कुणाला कोरोना झालाच तरी त्याला फोनव्दारे, व्हिडीओ कॉलद्वारे धीर द्यावा. या काळात मानसिक आरोग्य जपणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

- डॉ. हेमंत सोननीस, अध्यक्ष, आयएमए

--------

फोटो

११डॉ. सोननीस