शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, लसीनंतर दोन महिन्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:14 IST

नाशिक : कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्त संकलनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी आधीच असलेला रक्ताचा तुटवडा मार्च ...

नाशिक : कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्त संकलनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी आधीच असलेला रक्ताचा तुटवडा मार्च महिन्यापासून अधिक भासण्याची चिन्हे आहेत. त्यात लस घेणाऱ्यांना पहिल्या लसीनंतर सुमारे दोन महिने रक्तदान करता येणार नसल्याने तसेच बहुतांश रक्तदाते हेच यापुढील काळात लस घेणार असल्याने आता लस घेण्यापूर्वीच रक्तदान करून घेण्याचे आवाहन प्रशासन तसेच रक्तपेढ्यांच्यावतीने करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड रुग्णांना लसीकरणास प्रारंभ झाला आहे. त्याचबरोबर आता जनसंपर्क अधिक असणाऱ्या व्यक्तींच्या लसीकरणासदेखील प्रारंभ होणार आहे. प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. परिणामी रक्तदानात अधिकच घट झाली आहे. त्यात नियमित रक्तदाते असलेल्या नागरिकांनीदेखील लस घेतली तर त्यांना पहिल्या लसीनंतर किमान दोन महिने म्हणजेच दुसऱ्या डाेसनंतर एक महिना रक्तदान करता येणार नसल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात रक्ताचा मोठा तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नियमित रक्तदात्यांनी तसेच रक्त देण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी लसीकरणापूर्वीच रक्तदान केल्यास हा तुटवडा काही प्रमाणात तरी कमी होऊ शकेल. एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवतो. दरवर्षी स्वैच्छिक रक्तदान समितीच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्त तुटवड्यावर मात केली जाते. मात्र, यंदा उन्हाळ्यात तर ही समस्या अधिकच बिकट ठरणार असल्याने वेळीच उपाययाेजना आवश्यक आहेत.

इन्फो

रक्तदानाचे वास्तव

एप्रिल, जून, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये साधारणत: रक्ताचा तुटवडा असतो. त्यात यंदा कोरोनाची भर पडली. त्यामुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाणही कमी झाले आहे. नागरिकही घरातून बाहेर पडत नसल्याने रक्तदानाच्या प्रमाणात घट झाली आहे. अशा परिस्थिती नियमित रक्तदात्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यासच पुढील काळात गरजू रुग्णांचे जीव वाचविणे शक्य होणार आहे.

इन्फो

जिल्ह्यात १६ रक्त संकलन केंद्रे

राज्यात ३३२ परवानाधारक रक्तपेढ्या कार्यरत असून जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषाप्रमाणे लोकसंख्येच्या एक टक्का रक्त संकलन असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी ८ लाख असून लोकसंख्येच्या प्रमाणात १२ लाख रक्त पिशव्यांचे संकलन आवश्यक असते. तर नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या ७२ लाखांच्या आसपास असल्याने किमान ७० हजार रक्तपिशव्या दरवर्षी आवश्यक असतात. राज्यात रक्तपेढ्यांच्या संख्येत नाशिक जिल्हा पाचव्या स्थानावर असून नाशिक एकूण १६ रक्तपेढ्या आहेत. स्वैच्छिक रक्तदानामार्फत मिळालेले हे रक्त अशक्त माता, बालके, अपघातग्रस्त रुग्ण, कर्करुग्ण, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल व रक्ताच्या अन्य आजारांसाठी वापरले जाते.

कोट

रक्त संकलनाचे प्रमाण कोरोना काळात खूपच घटले आहे. त्यात दरवर्षी उन्हाळ्यात ते प्रमाण अधिकच घटत असते. तसेच नवीन लस घेणाऱ्यांना त्वरित रक्तदान करता येणार नसल्याने नियमित रक्तदात्यांनी लस घेण्यापूर्वी काही दिवस अगोदर रक्तदान करून घेतल्यास रक्तसाठा काही प्रमाणात तरी उपलब्ध राहू शकेल.

विनय शौचे, सीईओ, जनकल्याण रक्तपेढी