शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

जिल्ह्यात पुढील वर्षी तब्बल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:30 IST

धनंजय रिसोडकर लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : विकासकामांसाठी आणि एकंदरीतच आधुनिक राहणीसाठी लागणा-या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अजूनही पारंपरिक ...

धनंजय रिसोडकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : विकासकामांसाठी आणि एकंदरीतच आधुनिक राहणीसाठी लागणा-या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अजूनही पारंपरिक आणि खनिज इंधनांचाच वापर केला जातो; मात्र आता नाशिक जिल्ह्यात अपारंपरिक ऊर्जेच्या वापरासाठीच्या वीजनिर्मितीला चालना देण्यात आली असून, पुढील वर्षापासून जिल्ह्यात ५० मेगावाॅट सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे.

राज्य शासनाने २०१७ साली प्रारंभ केलेल्या मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात ५० मेगावाॅट निर्मिती केली जाणार आहे. त्याचवेळी राज्यभरात पहिल्या टप्प्यात १८४ मेगावाॅट सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. तर त्यापुढील टप्प्यांमध्ये अनुक्रमे १०० मेगावाॅट आणि १७९ मेगावाॅट ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांना प्रारंभ करण्यात येणार आहे. २००४ सालापासून, नवीन व पुनर्वापरायोग्य ऊर्जास्रोत मंत्रालयाच्या पुढाकाराने, भारतात हा दिवस साजरा होऊ लागला आहे. सध्याच्या काळात अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच आवश्यक तेवढाच वापर आणि शक्य तितकी बचत हाच ऊर्जा संवर्धनाचा सर्वश्रेष्ठ पर्याय असल्याने त्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांनीदेखील नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे.

इन्फो

शेतीला मिळेल दिवसा वीज

राज्यातील अनेक भागात रात्री, अपरात्रीच कृषी पंपांसाठी वीज उपलब्ध होते. त्याऐवजी पुढील वर्षापासून या सौर विजेचा वापर हा प्रामुख्याने कृषी फिडर असणाऱ्या सबस्टेशन्ससाठी केला जाणार आहे. त्यात स्थानिक फिडरच्या गरजेनुसार २ ते २५ मेगावाॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. येत्या तीन ते चार महिन्यात या सौर ऊर्जेव्दारे शेतातील कृषी पंपांना दिवसादेखील वीज मिळू शकणार आहे.

इन्फो

अपारंपरिकच्या वापरात हवी वाढ

अपारंपरिक ऊर्जेच्या वापराने समस्यांची बरीच उत्तरे मिळू शकतात. त्यामुळेच सौर, पवन, कृषी अवशेष, जल, सेंद्रिय कचरा, जैव–अवशेष, जैविक गॅस, बायोडिझेल, सीएनजी इत्यादींपासून मिळणा-या ऊर्जेचा वापर वाढवणे आवश्यक झाले आहे. सोलर हिटर, सौरदिवा तसेच अन्य सौर उपकरणांच्या वापरावर भर देण्यासह ग्रामीण क्षेत्रातील रस्ते, महामार्ग, मैदाने या ठिकाणीसुध्दा सौर ऊर्जेचे दिवे वापरता येतील. ज्या इंधनाला तयार होण्यास ३० लाख वर्षे जावी लागली, त्याचा निम्मा भाग आपण गत २०० वर्षातच खर्च केला आहे. त्यामुळेच गत दीड शतकात या पृथ्वीचे तापमान १ अंशाने वाढले असून, या शतकाअखेरीस तब्बल ५ ते ६ अंशांनी वाढण्याची शक्यता असल्याने ऊर्जा संवर्धन ही काळाची गरज बनली आहे.