शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पुढील वर्षी तब्बल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:30 IST

धनंजय रिसोडकर लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : विकासकामांसाठी आणि एकंदरीतच आधुनिक राहणीसाठी लागणा-या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अजूनही पारंपरिक ...

धनंजय रिसोडकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : विकासकामांसाठी आणि एकंदरीतच आधुनिक राहणीसाठी लागणा-या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अजूनही पारंपरिक आणि खनिज इंधनांचाच वापर केला जातो; मात्र आता नाशिक जिल्ह्यात अपारंपरिक ऊर्जेच्या वापरासाठीच्या वीजनिर्मितीला चालना देण्यात आली असून, पुढील वर्षापासून जिल्ह्यात ५० मेगावाॅट सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे.

राज्य शासनाने २०१७ साली प्रारंभ केलेल्या मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात ५० मेगावाॅट निर्मिती केली जाणार आहे. त्याचवेळी राज्यभरात पहिल्या टप्प्यात १८४ मेगावाॅट सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. तर त्यापुढील टप्प्यांमध्ये अनुक्रमे १०० मेगावाॅट आणि १७९ मेगावाॅट ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांना प्रारंभ करण्यात येणार आहे. २००४ सालापासून, नवीन व पुनर्वापरायोग्य ऊर्जास्रोत मंत्रालयाच्या पुढाकाराने, भारतात हा दिवस साजरा होऊ लागला आहे. सध्याच्या काळात अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच आवश्यक तेवढाच वापर आणि शक्य तितकी बचत हाच ऊर्जा संवर्धनाचा सर्वश्रेष्ठ पर्याय असल्याने त्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांनीदेखील नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे.

इन्फो

शेतीला मिळेल दिवसा वीज

राज्यातील अनेक भागात रात्री, अपरात्रीच कृषी पंपांसाठी वीज उपलब्ध होते. त्याऐवजी पुढील वर्षापासून या सौर विजेचा वापर हा प्रामुख्याने कृषी फिडर असणाऱ्या सबस्टेशन्ससाठी केला जाणार आहे. त्यात स्थानिक फिडरच्या गरजेनुसार २ ते २५ मेगावाॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. येत्या तीन ते चार महिन्यात या सौर ऊर्जेव्दारे शेतातील कृषी पंपांना दिवसादेखील वीज मिळू शकणार आहे.

इन्फो

अपारंपरिकच्या वापरात हवी वाढ

अपारंपरिक ऊर्जेच्या वापराने समस्यांची बरीच उत्तरे मिळू शकतात. त्यामुळेच सौर, पवन, कृषी अवशेष, जल, सेंद्रिय कचरा, जैव–अवशेष, जैविक गॅस, बायोडिझेल, सीएनजी इत्यादींपासून मिळणा-या ऊर्जेचा वापर वाढवणे आवश्यक झाले आहे. सोलर हिटर, सौरदिवा तसेच अन्य सौर उपकरणांच्या वापरावर भर देण्यासह ग्रामीण क्षेत्रातील रस्ते, महामार्ग, मैदाने या ठिकाणीसुध्दा सौर ऊर्जेचे दिवे वापरता येतील. ज्या इंधनाला तयार होण्यास ३० लाख वर्षे जावी लागली, त्याचा निम्मा भाग आपण गत २०० वर्षातच खर्च केला आहे. त्यामुळेच गत दीड शतकात या पृथ्वीचे तापमान १ अंशाने वाढले असून, या शतकाअखेरीस तब्बल ५ ते ६ अंशांनी वाढण्याची शक्यता असल्याने ऊर्जा संवर्धन ही काळाची गरज बनली आहे.