शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

जिल्हा रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातला़

By admin | Updated: December 3, 2014 02:08 IST

जिल्हा रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातला़

नाशिक : अंगावर गरमी पाणी पडल्याने भाजलेल्या एकाच कुटुंबातील दोघांचा उपचारादरम्यान हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाइकांनी मंगळवारी रात्री जिल्हा रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातला़ यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला़ दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता़ याबाबत अधिक माहिती अशी की, भद्रकालीतील पिंजारघाट परिसरात निजाम सय्यद हे पत्नी शहनाझ, मुलगा रजा, मुलगी अलीझा यांच्यासह राहतात़ शुक्रवारी (दि़ २८) रात्री घरातील इलेक्ट्रिक हिटरचे पाणी अंगावर पडल्याने निजाम सय्यद (३५ टक्के), त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रजा (४० टक्के) व मुलगी अलीझा (१० टक्के) भाजल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ उपचारादरम्यान रजाचा शनिवारी, तर निजाम सय्यद यांचा मंगळवारी मृत्यू झाला़ त्यांची मुलगी अलीझा गंभीर असून, पत्नीही गंभीर आहे़या अपघातात निजाम सय्यद हे व्यवस्थित बोलत होते; मात्र त्यांच्यावर योग्य उपचार केले गेले नसल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करून नातेवाइकांनी इमर्जन्सी वॉर्डातील सिस्टरांसोबत वाद घातला़ यावेळी पिंजारघाट परिसरातील जमलेले नागरिक व मृत व्यक्तींच्या नातेवाइकांनी डॉक्टरांना बोलावण्याची मागणी केली असता तेदेखील उपस्थित नव्हते व रुग्णालयातील दूरध्वनीही उचलून ठेवलेला होता़ याबाबत सिस्टरकडे विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या उद्धट उत्तरांमुळे नातेवाइकांच्या संतापात आणखीनच भर पडली़दरम्यान, या गोंधळाची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली़ दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता़ (प्रतिनिधी)