शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

जिल्ह्यात यंदा ९३ टक्के पाऊस

By admin | Updated: September 22, 2016 01:06 IST

गतवर्षीपेक्षा ३० टक्के अधिक : अतिवृष्टीचा इशारा

नाशिक : हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्णात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचन, उद्योगाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असून, परतीच्या पाऊसही गेल्या तीन दिवसांपासून कमी, अधिक प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा उंचावल्या आहेत. जिल्ह्णात यंदा उशिराने म्हणजेच जुलैच्या अखेरच्या टप्प्यात व आॅगस्टच्या प्रारंभी मान्सूनचे आगमन झाले, परंतु ते दमदार होते. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसाने संपूर्ण जिल्ह्णाला झोडपून काढले, एवढेच नव्हे तर नद्या, नाल्यांना पूर येऊन जीवित व वित्तहानीही सोसावी लागली; मात्र या पावसाने शेतकरी सुखावला, जिल्ह्णात ९० टक्क्याहून अधिक खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यानंतर जवळपास दीड महिना पावसाने दडी मारली. असे असले तरी, जिल्ह्णाची पावसाची वार्षिक सरासरी १६११७ मिलीमीटर इतकी असून, गेल्या वर्षी त्यापैकी ९७९८ मिलीमीटर इतकाच म्हणजेच एकूण सरासरीच्या ६० टक्के इतकाच पाऊस झाला होता. परिणामी खरीप हंगाम हातचा जाऊन दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा मात्र आॅगस्टमध्येच धुवाधार पाऊस कोसळून सारी भरपाई काढून टाकली. वर्षाकाठी तालुक्यांमध्ये पडणाऱ्या पावसापेक्षा यंदा इगतपुरीत १४४ टक्के, दिंडोरी-१२१, बागलाण-११७, निफाड-१०३, सिन्नर-११७ टक्केपाऊस झाला आहे. आजवर १४९३६ मिलीमीटर पाऊस म्हणजेच वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९३ टक्के झाला आहे. परतीच्या पावसाने तीन दिवसांपासून लावलेल्या हजेरीमुळे पाण्याची वाट पाहणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले, त्याचबरोबर नदी, नाल्याच्या साठ्यात वाढ झाली, शिवाय विहिरींनाही त्याचा फायदा झाला आहे. अजून काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार असल्याचा व्यक्त होत असलेला अंदाज पाहता, रब्बी हंगामासाठी तो उपयुक्त ठरू शकतो. (प्रतिनिधी)हवामान खात्याचा इशारापरतीच्या पावसाचे अनुकूल वातावरण सर्वत्र तयार झाल्याने हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बुधवारी नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. आगामी ४८ तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊन नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.