शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यात कोसळधार

By admin | Updated: September 18, 2015 23:22 IST

जिल्ह्यात कोसळधार

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने काल (दि. १८) सिंहस्थ पर्वणीच्या अखेरच्या तिसऱ्या शाहीस्नानाच्या आणि ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी पहाटे ३ वाजेपासूनच जिल्ह्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली. पहाटे सुरू झालेल्या पावसाचा जोर दिवसभर कायम राहिल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणांत पाणीसाठा वाढल्याचे चित्र होते.काल सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्णात सरासरी ४७ (७१०.९) मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात तालुकानिहाय नोेंदविण्यात आलेल्या पावसाची मिलीमीटरमध्ये आकडेवारी पुढीलप्रमाणे- नाशिक- ४६.३, इगतपुरी-५७, दिंडोरी-४५, पेठ-१२.२, त्र्यंबकेश्वर- २६, मालेगाव-९६, नांदगाव-५२, चांदवड-२८.६, कळवण-७७.७, बागलाण-२०, सुरगाणा- २४.४, देवळा- ४६७.२, निफाड- ५६.४, सिन्नर-८८, येवला-३८९ असा एकुण- ७१०. ९ (सरासरी ४७ टक्के ) नोंदविण्यात आला. या पावसामुळे रब्बी हंगामाला फायदा होणार असून, जिल्ह्यातील अत्यल्प असलेल्या धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ होणार आहे. काल पहाटे ३ वाजेपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दुपारी ३ पर्यंत कायम होता. तीन वाजेनंतर जोर थोडा कमी झाला तरी पावसाची संततधार मात्र कायम होती. या कालच्या पावसामुळे पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांना त्याचा फायदा होणार असून, पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)इन्फो..जोर दोन दिवसकाल पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दिवसभर कायम होता. हवामान खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाचा असाच जोर शनिवारी (दि.१९) व रविवारी (२०) कायम राहणार असल्याचे भाकित वर्तविले आहे. पावसाचा जोर असाच तीन दिवस कायम राहिल्यास जिल्ह्णातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. खरिपासाठी या पावसाचा फारसा फायदा होणार नसला तरी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास त्यामुळे खूप मदत होणार आहे.