शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

जिल्ह्यात कोसळधार

By admin | Updated: September 18, 2015 23:22 IST

जिल्ह्यात कोसळधार

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने काल (दि. १८) सिंहस्थ पर्वणीच्या अखेरच्या तिसऱ्या शाहीस्नानाच्या आणि ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी पहाटे ३ वाजेपासूनच जिल्ह्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली. पहाटे सुरू झालेल्या पावसाचा जोर दिवसभर कायम राहिल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणांत पाणीसाठा वाढल्याचे चित्र होते.काल सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्णात सरासरी ४७ (७१०.९) मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात तालुकानिहाय नोेंदविण्यात आलेल्या पावसाची मिलीमीटरमध्ये आकडेवारी पुढीलप्रमाणे- नाशिक- ४६.३, इगतपुरी-५७, दिंडोरी-४५, पेठ-१२.२, त्र्यंबकेश्वर- २६, मालेगाव-९६, नांदगाव-५२, चांदवड-२८.६, कळवण-७७.७, बागलाण-२०, सुरगाणा- २४.४, देवळा- ४६७.२, निफाड- ५६.४, सिन्नर-८८, येवला-३८९ असा एकुण- ७१०. ९ (सरासरी ४७ टक्के ) नोंदविण्यात आला. या पावसामुळे रब्बी हंगामाला फायदा होणार असून, जिल्ह्यातील अत्यल्प असलेल्या धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ होणार आहे. काल पहाटे ३ वाजेपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दुपारी ३ पर्यंत कायम होता. तीन वाजेनंतर जोर थोडा कमी झाला तरी पावसाची संततधार मात्र कायम होती. या कालच्या पावसामुळे पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांना त्याचा फायदा होणार असून, पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)इन्फो..जोर दोन दिवसकाल पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दिवसभर कायम होता. हवामान खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाचा असाच जोर शनिवारी (दि.१९) व रविवारी (२०) कायम राहणार असल्याचे भाकित वर्तविले आहे. पावसाचा जोर असाच तीन दिवस कायम राहिल्यास जिल्ह्णातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. खरिपासाठी या पावसाचा फारसा फायदा होणार नसला तरी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास त्यामुळे खूप मदत होणार आहे.