शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

जिल्हा प्रशासनाकडून राज्यपालांची दिशाभूल सामूहिक वनहक्क दावे : १८ बैठकांना अधिकाऱ्यांच्या दांड्या

By admin | Updated: May 26, 2015 01:28 IST

जिल्हा प्रशासनाकडून राज्यपालांची दिशाभूल सामूहिक वनहक्क दावे : १८ बैठकांना अधिकाऱ्यांच्या दांड्या

  नाशिक : वनहक्क कायद्यांतर्गत खेड्या-पाड्यांतील आदिवासींना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी वन खात्याच्या ताब्यातील जंगल उपलब्ध करून देणाऱ्या सामूहिक वनहक्क दाव्यांच्या वाटपाबाबत जिल्हा प्रशासनाने राज्यपाल सी. व्ही. राव यांची दिशाभूल केल्याचे उघड झाले असून, जानेवारी अखेरीस २८८ प्रकरणे मंजूर करून प्रत्यक्ष कब्जा दिल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाने प्रत्यक्षात एकाही प्रकरणाला मंजुरी तर दिलीच नाही; परंतु चार महिन्यांत झालेल्या १८ बैठकांकडे अधिकाऱ्यांनीच पाठ फिरविल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे. वनहक्क कायदा व त्याच्या अंमलबजावणीबाबत राज्याचे राज्यपाल आग्रही असून, महिन्यातून त्यांच्याकडून याबाबतचा आढावा घेतला जातो. वनहक्क कायद्यांतर्गत मोडणाऱ्या सामूहिक वनहक्क दाव्यांच्या माध्यमातून आदिवासींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी संपूर्ण गावालाच त्यांच्या लगतच्या वन जंगलाचा ताबा देण्याच्या राज्यपालांच्या सूचना आहेत. जेणे करून आदिवासी वाडी वा वस्ती लगत असलेल्या वन खात्याच्या जंगलातील नैसर्गिक संपत्तीवर त्याच पंचक्रोशीतील आदिवासींचा हक्क असेल, म्हणजेच जंगलातील डिंक, तेंदूपत्ता, फळे, मोह फुले, गवत अशा जंगलनिर्मित वस्तू विक्री करून त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकेल. सामूहिक वनहक्क दाव्यांच्या मंजुरीअभावी सध्या वन खाते आदिवासींना त्यांच्या जंगलात प्रवेश करू देत नाहीत, त्यामुळे सामूहिक वनहक्क दाव्यांची अधिकाधिक संख्या वाढवून त्याला मंजुरी दिली जावी यासाठी स्वत: राज्यपालांचा कटाक्ष आहे व त्यासाठी त्यांनी जानेवारी महिन्यात नाशिक जिल्'ाला भेट देऊन जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. त्यावेळी नाशिक जिल्'ात व विशेष करून पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, हरसूल या भागांतील सामूहिक वनहक्काचे २८८ दावे दाखल असल्याचे व त्याला मंजुरी दिल्याची माहिती राज्यपालांना जिल्हा प्रशासनाने म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. प्रत्यक्षात वनहक्क कायद्यांतर्गत गठीत जिल्हास्तरीय समितीने यातील एकाही सामूहिक दाव्याला मंजुरीच दिलेली नाही, उलट असे दावे मंजूर असल्याचे सांगून राज्यपालांची दिशाभूलच केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हास्तरीय समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, समितीचे सदस्य सचिव म्हणून आदिवासी अपर आयुक्त,तर सदस्य म्हणून उपवन संरक्षक पूर्व व पश्चिम तसेच आदिवासी भागातून निवडून आलेले जिल्हा परिषदेचे तीन सदस्य अशासकीय सदस्य म्हणून शासन नियुक्त आहेत. सामूहिक वनहक्क दाव्यांबाबत राज्य सरकार व राज्यपालांचा असलेला आग्रह पाहता, महिन्यातील पहिला व तिसरा शनिवार तसेच दुसऱ्या व चौथ्या बुधवारी जिल्हा समितीची बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रत्यक्षात जानेवारी महिन्यापासून या समितीची बैठकच झालेली नाही. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अखत्यारितील हा विषय अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून आपले अंग काढून घेतले आहे, तर सदस्य सचिव असलेल्या आदिवासी विभागाच्या अपर आयुक्तांना तसेच उपवन संरक्षक अधिकाऱ्यांना त्याचे सोयरसुतकच नाही, परिणामी अठरा बैठकांना या अधिकाऱ्यांनीच दांड्या मारून आपल्यातील नाकर्तेपणाचे दर्शन घडविले आहे.