शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

चार लाख रुपये नुकसान भरपाईच्या बनावट मेसेजमुळे जिल्हा प्रशासनापुढे उभा राहिला पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST

नाशिक: कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना आपत्ती विभागाकडून चार लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल ...

नाशिक: कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना आपत्ती विभागाकडून चार लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात गेल्या काही दिवसात दोन हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारची कोणतीही योजना नसताना आलेल्या अर्जांचे करायचे काय, असा पेच प्रशासनापुढे उभा राहिला आहे.

कोरोनामुळे दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत केली जाणार असल्याचा मेजेस गेल्या पंधरा दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याच्या आशयाचा हा मेसेज असून, मदतीसाठी करावयाचा अर्ज, न्यायालयाचा निकाल आणि मंत्रालयाचे पत्र असेदेखील पुष्ठ्यर्थ जोडण्यात आलेले आहेत.

--इन्फो--

आपत्ती व्यवस्थापनाकडे आले दोन हजार अर्ज

आपत्ती व्यवस्थापन विभागाचा उल्लेख असलेला मेसेज फिरत असल्याने नाशिकच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागात दररोज अर्ज दाखल होत आहेत. जिल्हाभरातून आलेले अर्ज काही टपालातून प्राप्त झाले आहेत, तर काहींनी प्रत्यक्ष कार्यालयात आणून दिले आहेत. काहींनी आवक - जावक विभागात अर्ज जमा केले.

--इन्फो--

अर्जांना उत्तर देण्याची वेळ

अशा प्रकारची योजनाच अस्तित्वात नसल्यामुळे आलेल्या अर्जांना उत्तर देण्याची वेळ जिल्हा प्रशासनापुढे आली आहे. या अर्जांना उत्तर दिले नाही तर त्यांच्याकडून सातत्याने विचारणा होण्याची तसेच मदतीच्या प्रतीक्षेत राहतील. त्यामुळे त्यांना अशी कोणतीही योजना नसल्याबाबबते पत्र उलट टपाली पाठविले जाण्याबाबतचा विचार केला जात आहे.

---इन्फो--

काय आहे बनावट मेसेज

कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तिच्या कुटुंबीयांना केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून ४ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे. सोबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बातमी, शासन आदेश, क्लेम फॉर्म जोडण्यात आलेले आहेत. गरजूंनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात अर्ज सादर करावा.

---कोट--

अशा प्रकारची कोणतीही योजना केंद्र किंवा राज्य शासनाकडून कळविण्यात आलेली नाही. हा बनावट मेसेज असून नागरिकांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष करावे.

- अर्जुन कुऱ्हाडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख. नाशिक.