शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख रुपये नुकसान भरपाईच्या बनावट मेसेजमुळे जिल्हा प्रशासनापुढे उभा राहिला पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST

नाशिक: कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना आपत्ती विभागाकडून चार लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल ...

नाशिक: कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना आपत्ती विभागाकडून चार लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात गेल्या काही दिवसात दोन हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारची कोणतीही योजना नसताना आलेल्या अर्जांचे करायचे काय, असा पेच प्रशासनापुढे उभा राहिला आहे.

कोरोनामुळे दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत केली जाणार असल्याचा मेजेस गेल्या पंधरा दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याच्या आशयाचा हा मेसेज असून, मदतीसाठी करावयाचा अर्ज, न्यायालयाचा निकाल आणि मंत्रालयाचे पत्र असेदेखील पुष्ठ्यर्थ जोडण्यात आलेले आहेत.

--इन्फो--

आपत्ती व्यवस्थापनाकडे आले दोन हजार अर्ज

आपत्ती व्यवस्थापन विभागाचा उल्लेख असलेला मेसेज फिरत असल्याने नाशिकच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागात दररोज अर्ज दाखल होत आहेत. जिल्हाभरातून आलेले अर्ज काही टपालातून प्राप्त झाले आहेत, तर काहींनी प्रत्यक्ष कार्यालयात आणून दिले आहेत. काहींनी आवक - जावक विभागात अर्ज जमा केले.

--इन्फो--

अर्जांना उत्तर देण्याची वेळ

अशा प्रकारची योजनाच अस्तित्वात नसल्यामुळे आलेल्या अर्जांना उत्तर देण्याची वेळ जिल्हा प्रशासनापुढे आली आहे. या अर्जांना उत्तर दिले नाही तर त्यांच्याकडून सातत्याने विचारणा होण्याची तसेच मदतीच्या प्रतीक्षेत राहतील. त्यामुळे त्यांना अशी कोणतीही योजना नसल्याबाबबते पत्र उलट टपाली पाठविले जाण्याबाबतचा विचार केला जात आहे.

---इन्फो--

काय आहे बनावट मेसेज

कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तिच्या कुटुंबीयांना केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून ४ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे. सोबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बातमी, शासन आदेश, क्लेम फॉर्म जोडण्यात आलेले आहेत. गरजूंनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात अर्ज सादर करावा.

---कोट--

अशा प्रकारची कोणतीही योजना केंद्र किंवा राज्य शासनाकडून कळविण्यात आलेली नाही. हा बनावट मेसेज असून नागरिकांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष करावे.

- अर्जुन कुऱ्हाडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख. नाशिक.