शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांना सोडवेना नगरसेवकपदाचा मोह

By admin | Updated: December 22, 2014 00:48 IST

दोन्ही थडींवर हात : कार्यकर्त्यांना हवी संधी, नवनिर्वाचित आमदारांची चुप्पी; प्रदेशस्तरावरून निर्णयाची प्रतीक्षा

नाशिक : विधिमंडळातील मोठ्या सभागृहात जाण्याची संधी मिळूनही भाजपाचे चार आमदार अजून आपल्या प्रभागातच अडकून पडले असून, दोन महिने उलटून गेल्यानंतरही नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याबाबत मौन पाळले आहे. आमदार म्हणून निवडून गेले तरी नगरसेवकपद कायम ठेवण्याची परंपरा या चौघाही आमदारांनी पाळण्याचे ठरविलेले दिसते. दोन्ही थडींवर हात ठेवण्याचा हा मोह मात्र संबंधित आमदारांच्या प्रभागातील पक्षकार्यकर्त्यांमध्ये असंतोषाला पूरक ठरत आहे. पक्षपातळीवरूनही संबंधित आमदारांना पद सोडण्याबाबत कुठल्याही हालचाली होताना दिसून येत नसल्याने पक्षाविषयीही नाराजीचा सूर उमटू लागला आहे. नाशिक महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक प्रा. देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सौ. सीमा हिरे (नाशिक पश्चिम), बाळासाहेब सानप (नाशिक पूर्व) आणि डॉ. राहुल अहेर (चांदवड) हे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. भाजपाचे हे चारही नगरसेवक महापालिकेतून विधानसभेवर निवडून गेल्यानंतर ते नगरसेवकपदाचा राजीनामा देतील आणि त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर पोटनिवडणूक होऊन संधी मिळेल या अपेक्षेने भाजपातीलच काही कार्यकर्ते कामाला लागले होते. परंतु विधानसभा निवडणूक होऊन दोन महिने लोटले तरी अद्याप या चारही आमदारांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेला नाही आणि त्यासंबंधी जाहीर भूमिकाही प्रदर्शित केली नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर संभ्रमावस्था आहे. दोन महिन्यांत महापालिकेच्या झालेल्या महासभांना हे चारही आमदार गैरहजर राहिले. नुकत्याच झालेल्या महासभेच्या वेळी तर नागपूरला विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. आता केवळ एका छोटेखानी प्रभागाचे नव्हे तर एका विधानसभा मतदारसंघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळावी लागणार असल्याने आमदारांचा कामाचा व्यापही वाढणार आहे. अशा स्थितीत त्यांना महापालिकेच्या कामकाजात कितपत स्वारस्य असेल, याबाबत शंकाच आहे. पालिका निवडणुकीत सेना-भाजपा युती नसतानादेखील बाळासाहेब सानप हे प्रभाग क्रमांक ११ मधील सर्वसाधारण जागेवर महापालिकेत निवडून गेले होते. त्यांनी मोठ्या मताधिक्याने एकहाती विजय संपादन केला होता. प्रा. देवयानी फरांदे या प्रभाग १४ मधून ओबीसी महिलांसाठी आरक्षित जागेवर विजयी झाल्या. त्यांनीदेखील मोठे मताधिक्य मिळवित विजय प्राप्त केला होता. प्रभाग १५ मध्ये तर सीमा हिरे यांनी ओबीसी महिला या राखीव जागेवर विजय मिळविला तर याच प्रभागातील दुसऱ्या जागेवर सर्वसाधारण गटातून डॉ. राहुल अहेर यांचा अवघ्या १५९ मतांनी विजय झाला होता. आमदार बनलेल्या या चारही नगरसेवकांनी राजीनामा दिला आणि रिक्त जागांवर पोटनिवडणूक झालीच तर राहुल अहेर वगळता इतरांच्या प्रभागात भाजपाला विजय मिळविणे अवघड नाही; परंतु बदललेली समीकरणे पाहता नामुष्की नको म्हणून बहुधा पक्षपातळीवरही आमदारांच्या राजीनाम्याबाबत मौन पाळले जात असावे. (प्रतिनिधी)