शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

ग्रामसभेच्या माहितीबाबत उदासीनता

By admin | Updated: February 1, 2016 22:26 IST

कळवण : ७१ ग्रामपंचायतींनी माहिती दिली नसल्याचे उघड

कळवण : २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभांमध्ये घेण्यात आलेल्या विषयांबाबत जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पंचायत समितीमार्फत मार्गदर्शन करून १ ते १६ विषय चर्चेत घेऊन ग्रामसभा झाल्यानंतर ३० जानेवारीपर्यंत इतिवृत्त व त्याची माहिती, झालेले ठराव तत्परतेने पंचायत समिती ग्रामपंचायत विभागाला सादर करणे बंधनकारक केले होते; मात्र आठवडा उलटूनही तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींनी माहिती सादर केली नसल्याची बाब समोर आली आहे.सात दिवसांत फक्त १५ ग्रामपंचायतींनी कळवण पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात माहिती सादर केली असल्याचे समोर आले आहे. येत्या ३ ते ४ दिवसात उर्वरित ग्रामपंचायतीची माहिती मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. मात्र ग्रामसभेच्या माहितीबाबत असलेली उदासीनता समोर आली आहे.पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाकडून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्याचे आणि तसा अहवाल पाठविण्याचे आदेश काढले होते. त्यासाठी पत्रही पाठविले होते. तालुक्यात ८६ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील प्रथम नागरिक म्हणून ग्रामसभा यशस्वी करण्याच्या दृष्टीने सरपंच यांच्या उपस्थितीत ग्रामसभा १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा शासकीय यंत्रणेने केला असून प्रत्यक्षात ग्रामसभा घेताना नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. (वार्ताहर) अनेक योजना ,शासनाचा निधी ,याची माहिती ग्रामस्थपर्यंत पोहोचली नसल्याचा दावा केला जात असून, ग्रामसभांमध्ये शासनाच्या योजनाची माहिती तसेच इतर माहिती ग्रामस्थांना दिली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. कळवण पंचायत समितीच्या दप्तरी मात्र कळवण तालुक्यात १०० टक्के ग्रामसभा झाल्याची नोंद आहे. (वार्ताहर)