शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान

By admin | Updated: October 6, 2016 01:02 IST

येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची रिक्त पदे असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

कुलुप ठोकण्याचा इशारा : जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्षपरसवाडा : येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची रिक्त पदे असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वर्ग ११ व १२ साठी सहा पदे मंजूर असून फक्त दोन शिक्षक कार्यरत आहेत तर चार शिक्षक रिक्त आहेत. यात मराठी व इतिहास शिक्षकच असल्याने इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल या विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. नववी ते दहावी वर्गासाठी सहा पदे मंजूर असून दोन रिक्त आहेत. यात कला व विज्ञान विषयाचे शिक्षकच नाही. वर्ग सहावी ते आठवीसाठी सहा शिक्षक असून दोन रिक्त आहेत व पाचवीसाठी एक पद रिक्त आहे. यामुळे विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होत असून जि.प. शिक्षण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. एकीकडे शिक्षणाधिकारी प्रकल्पाचा उदो उदो करतात, पण रिक्त शिक्षकांची पूर्तता का करीत नाही, यासाठी शासन स्तरावर उदो उदो का करीत नाही. शिक्षकांची कमतरता असेल तर विद्यार्थ्यांना कोण शिकविणार. शिक्षकांची पदे त्वरित भरुन व बदली झालेले शिक्षक त्वरित रुजू करण्याचे आदेश देण्यात यावे. शाळेतून तीन शिक्षकांची बदली करण्यात आली व त्यांना रुजूही करण्यात आले. पण दुसऱ्या शाळेतून येणारे शिक्षक तीन महिन्यांचा काळ लोटूनही रुजू झाले नाही. तरी प्रा. कावळे यांना त्याच शाळेत रुजू करण्यासाठी फेरविचार करण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धमेंद्र टेकाम, रवी मेश्राम, बाळू सोनवाने, बोपचे, सुभाष बोपचे, हिंगे, निता हिंगे, कोटांगले, इतर सर्व सदस्यांनी केली आहे. आठ दिवसांत शिक्षक न दिल्यास कुलूप कोणत्याही दिवशी ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)