शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

नायगाव खोऱ्यातील प्रवाशांची गैरसोय

By admin | Updated: August 21, 2016 23:07 IST

सायखेडा : मार्गावरील बसचे नियोजन करण्याची मागणी

 नायगाव : गेल्या महिनाभरापासून सिन्नर-शिर्डी मार्गावरील बसेसच्या नियोजनात बदल करण्यात आल्याने नायगाव खोऱ्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. सिन्नर आगाराने याबाबत नियोजन करण्याची मागणी होत आहे. सिन्नर-नायगाव-सायखेडा या महत्त्वाच्या मार्गावर दिवसभरात फक्त चारच बस धावत असल्याने परिसरातील प्रवाशांचे आधीच हाल होत आहेत. त्यातच गेल्या महिनाभरापासून सिन्नर आगारातून सिन्नर-सायखेडा-ओझर व सिन्नर-सायखेडा या दोन बसेस सकाळी साडेसहा व ८ वाजता नायगावमार्गे ओझर व सायखेडा येथे जातात. या गाड्या पुन्हा याच मार्गे प्रवास करताना नायगाव येथून कधी सोबत तर कधी दहा-पंधरा मिनिटांच्या अंतराने जातात. सिन्नरकडे जाणाऱ्या या दोन्ही सकाळी ९ वाजेच्या अगोदरच सिन्नरला परतत असल्याने नायगावसह परिसरातील जायगाव, जोगलटेंभी, सोनगिरी, देशवंडी आदी गावांतील नागरिकांना दिवसभरात सिन्नरकडे जाण्यासाठी खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सायखेडा येथील गोदावरी नदीवरील पूल अवजड वाहनांना बंद केल्याने सिन्नरहून जाणाऱ्या दोन्ही बस सायखेड्यापासूनच पुन्हा सिन्नरकडे फिरतात. दोन्ही बस बरोबरच येत असल्याने व सकाळी नऊ वाजेनंतर या रस्त्यावरुन पुन्हा बस नाही. सिन्नर आगाराच्या या नियोजनशून्य कारभाराचा नायगाव खोऱ्यातील प्रवाशांना फटका बसत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सिन्नर बसस्थानक प्रशासनाने यामार्गावरील बसचे फेरनियोजन करुन नवीन बसच्या फेऱ्या सुरु करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे. (वार्ताहर)