शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

जिल्ह्यात धुवाधार

By admin | Updated: September 18, 2015 22:29 IST

धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ

जिल्ह्यात धुवाधार धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढसिन्नर : पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात वरुणराजाने हजेरी लावल्यानंतर रुसलेला पाऊस अंतिम चरणात सिन्नरकरांवर चांगलाच बरसला. गुरुवारी रात्री २ वाजेपासून पावसाला प्रारंभ झाला. सिन्नर शहरात मुसळधार, तर तालुक्यात सर्वदूर मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरात सहा तासात तब्बल ८८ मिमी पाऊस पडला. यामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. सलग पाचव्या वर्षी सिन्नरकर दुष्काळाचा सामना करीत आहेत. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात पावसाने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर पाऊस गायब झाला होता. सुमारे तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री पावसाचे जोरदार आगमन झाले. गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात सुरूच होता. तालुक्यातील धरणातील पाणीसाठा काही प्रमाणात का होईना वाढला आहे.पश्चिम भागातून उगम पावणारी म्हाळुंगी नदी वाहू लागल्याने भोजापूर धरणात पाण्याची आवक होणार आहे. शहराजवळील सरदवाडी धरणात ४० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा दुपारपर्यंत दिसून येत होता. तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास नळपाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळणार आहे. चालू पावसाळ्यात गेल्या बारा तासात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. खरिपाची पिके पूर्णपणे वाया गेली असली तरी या पावसाने विहिरींना पाणी उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धरणांमध्ये चांगले पाणी आल्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बीचा फायदा होऊ शकतो. यावर्षी खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नजरपीक आणेवारीत सिन्नर तालुक्याततील सर्व गावांची आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. त्यावरून दुष्काळाची व खरीप पिकांच्या नुकसानीचा अंदाज येतो.गणपतीच्या आगमनाबरोबरच पाऊस आल्याने ‘बाप्पा पावले’ अशीच चर्चा होतीे. शहरात पावसाचा जोर जास्त असून, ग्रामीण भागात मध्यम पाऊस आला. तालुक्यातील सर्व गावांमध्ये पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टाकेद परिसरात संततधार

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील पूर्वभागात पहाटे ४ वाजेपासून पावसाची संततधार सुरू झाल्याने परिसरातील लेंडी नाला, करंजीचा ओहळ व कडवा निद दुथडी भरून वाहत आहे.ब-याच दिवसापासुन बळीराजा पावसाची वाट पाहत होता.तरी सुध्दा काहीभागात रिम झीम सरी बरसत होत्या यामुळे समाधान होत नव्हते .भातिपकासाठी पावसाची आवश्यकता तर होतीच त्यातच शुक्र वारी गणपतीचे आगमन झाले व पहाटे चार पासुन पाऊसाने जी सुरवात केली ती सांयकाळपर्यंतही सुरूच होती .या पुर्वभागात पुर्ण टाकेद धामणगाव आंबेवाडी खो-यात आज कुठेही सुर्यदर्शन झाले नाही. या पावसामुळे गणेश मंडळांची बरीच तारांबळ ऊडाली तरी सुध्दा गणेशाचे आगमन सुखकारकच ठरल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.( वार्ताहर )