शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धुवाधार

By admin | Updated: September 18, 2015 22:29 IST

धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ

जिल्ह्यात धुवाधार धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढसिन्नर : पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात वरुणराजाने हजेरी लावल्यानंतर रुसलेला पाऊस अंतिम चरणात सिन्नरकरांवर चांगलाच बरसला. गुरुवारी रात्री २ वाजेपासून पावसाला प्रारंभ झाला. सिन्नर शहरात मुसळधार, तर तालुक्यात सर्वदूर मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरात सहा तासात तब्बल ८८ मिमी पाऊस पडला. यामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. सलग पाचव्या वर्षी सिन्नरकर दुष्काळाचा सामना करीत आहेत. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात पावसाने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर पाऊस गायब झाला होता. सुमारे तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री पावसाचे जोरदार आगमन झाले. गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात सुरूच होता. तालुक्यातील धरणातील पाणीसाठा काही प्रमाणात का होईना वाढला आहे.पश्चिम भागातून उगम पावणारी म्हाळुंगी नदी वाहू लागल्याने भोजापूर धरणात पाण्याची आवक होणार आहे. शहराजवळील सरदवाडी धरणात ४० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा दुपारपर्यंत दिसून येत होता. तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास नळपाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळणार आहे. चालू पावसाळ्यात गेल्या बारा तासात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. खरिपाची पिके पूर्णपणे वाया गेली असली तरी या पावसाने विहिरींना पाणी उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धरणांमध्ये चांगले पाणी आल्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बीचा फायदा होऊ शकतो. यावर्षी खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नजरपीक आणेवारीत सिन्नर तालुक्याततील सर्व गावांची आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. त्यावरून दुष्काळाची व खरीप पिकांच्या नुकसानीचा अंदाज येतो.गणपतीच्या आगमनाबरोबरच पाऊस आल्याने ‘बाप्पा पावले’ अशीच चर्चा होतीे. शहरात पावसाचा जोर जास्त असून, ग्रामीण भागात मध्यम पाऊस आला. तालुक्यातील सर्व गावांमध्ये पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टाकेद परिसरात संततधार

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील पूर्वभागात पहाटे ४ वाजेपासून पावसाची संततधार सुरू झाल्याने परिसरातील लेंडी नाला, करंजीचा ओहळ व कडवा निद दुथडी भरून वाहत आहे.ब-याच दिवसापासुन बळीराजा पावसाची वाट पाहत होता.तरी सुध्दा काहीभागात रिम झीम सरी बरसत होत्या यामुळे समाधान होत नव्हते .भातिपकासाठी पावसाची आवश्यकता तर होतीच त्यातच शुक्र वारी गणपतीचे आगमन झाले व पहाटे चार पासुन पाऊसाने जी सुरवात केली ती सांयकाळपर्यंतही सुरूच होती .या पुर्वभागात पुर्ण टाकेद धामणगाव आंबेवाडी खो-यात आज कुठेही सुर्यदर्शन झाले नाही. या पावसामुळे गणेश मंडळांची बरीच तारांबळ ऊडाली तरी सुध्दा गणेशाचे आगमन सुखकारकच ठरल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.( वार्ताहर )