शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

जिल्ह्यात धुवाधार

By admin | Updated: September 18, 2015 22:29 IST

धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ

जिल्ह्यात धुवाधार धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढसिन्नर : पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात वरुणराजाने हजेरी लावल्यानंतर रुसलेला पाऊस अंतिम चरणात सिन्नरकरांवर चांगलाच बरसला. गुरुवारी रात्री २ वाजेपासून पावसाला प्रारंभ झाला. सिन्नर शहरात मुसळधार, तर तालुक्यात सर्वदूर मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरात सहा तासात तब्बल ८८ मिमी पाऊस पडला. यामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. सलग पाचव्या वर्षी सिन्नरकर दुष्काळाचा सामना करीत आहेत. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात पावसाने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर पाऊस गायब झाला होता. सुमारे तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री पावसाचे जोरदार आगमन झाले. गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात सुरूच होता. तालुक्यातील धरणातील पाणीसाठा काही प्रमाणात का होईना वाढला आहे.पश्चिम भागातून उगम पावणारी म्हाळुंगी नदी वाहू लागल्याने भोजापूर धरणात पाण्याची आवक होणार आहे. शहराजवळील सरदवाडी धरणात ४० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा दुपारपर्यंत दिसून येत होता. तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास नळपाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळणार आहे. चालू पावसाळ्यात गेल्या बारा तासात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. खरिपाची पिके पूर्णपणे वाया गेली असली तरी या पावसाने विहिरींना पाणी उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धरणांमध्ये चांगले पाणी आल्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बीचा फायदा होऊ शकतो. यावर्षी खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नजरपीक आणेवारीत सिन्नर तालुक्याततील सर्व गावांची आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. त्यावरून दुष्काळाची व खरीप पिकांच्या नुकसानीचा अंदाज येतो.गणपतीच्या आगमनाबरोबरच पाऊस आल्याने ‘बाप्पा पावले’ अशीच चर्चा होतीे. शहरात पावसाचा जोर जास्त असून, ग्रामीण भागात मध्यम पाऊस आला. तालुक्यातील सर्व गावांमध्ये पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टाकेद परिसरात संततधार

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील पूर्वभागात पहाटे ४ वाजेपासून पावसाची संततधार सुरू झाल्याने परिसरातील लेंडी नाला, करंजीचा ओहळ व कडवा निद दुथडी भरून वाहत आहे.ब-याच दिवसापासुन बळीराजा पावसाची वाट पाहत होता.तरी सुध्दा काहीभागात रिम झीम सरी बरसत होत्या यामुळे समाधान होत नव्हते .भातिपकासाठी पावसाची आवश्यकता तर होतीच त्यातच शुक्र वारी गणपतीचे आगमन झाले व पहाटे चार पासुन पाऊसाने जी सुरवात केली ती सांयकाळपर्यंतही सुरूच होती .या पुर्वभागात पुर्ण टाकेद धामणगाव आंबेवाडी खो-यात आज कुठेही सुर्यदर्शन झाले नाही. या पावसामुळे गणेश मंडळांची बरीच तारांबळ ऊडाली तरी सुध्दा गणेशाचे आगमन सुखकारकच ठरल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.( वार्ताहर )