शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

भक्तांनी नैसर्गिकतेच्या अधिक जवळ जावे

By admin | Updated: December 21, 2016 23:09 IST

घळसासी : ‘सुसंगती सदा घडो’ या विषयावर संवाद

नाशिक : दैनंदिन जीवनात इतरांचा द्वेष करणे चुक ीचे आहे. सकारात्मकता जिथे लाभेल तेथेच मानवाने अधिकाधिक वेळ घालवावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत विवेक घळसासी यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित प्रवचनप्रसंगी व्यक्त केले. गंगापूररोड येथील चैतन्यवाटिकेत आयोजित कार्यक्रमात ‘सुसंगती सदा घडो’ या विषयावर घळसासी यांनी मार्गदर्शन केले. आपल्या प्रवचनात पुढे बोलताना घळसासी यांनी स्वभावासाठी सुसंगतीचा ध्यास असणे आवश्यक असल्याचे सांगितले. कलीयुगात फक्त नामाच्याच आधाराने आपले जीवन सुकर होऊ शकते, असे सांगताना सुसंगतीसाठी नाम आवश्यक असून, नामानेच आपल्यातील कुसंगतीचे प्रमाण कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. निसर्गाच्या जवळ जाता येत नसेल तर नैसर्गिकतेच्या जवळ जावे आणि कृत्रिमतेचा अट्टहास सोडण्याचे आवाहनही घळसासी यांनी यावेळी केले.निसर्गाच्या जवळ जाणे शक्य नसल्यास आपल्या हृदयात असणाऱ्या निसर्गाच्या अंतरंगाचा आनंद घ्यावा आणि याची अनुभूती आपण डोळे मिटून ध्यान केल्यावर निश्चितच घेता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मानवाने नेहमी गतीशी सुसंगत असायला हवे. गतीशी आपला मेळ संपला तर आपल्या जीवनातील आनंद संपेल असे सांगताना, आनंद मिळवताना दु:ख परतवून लावण्याचे आवाहनही विवेक घळसासी यांनी केले. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांची सांगता गुरुवारी (दि. २२) विवेक घळसासी यांच्या ‘गुरू परमात्मा परेशु’ या विषयावरील प्रवचनाने होणार असून अधिकाधिक भक्तांनी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)