शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

देवगावी उघडे रोहित्र बनले धोकेदायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:17 IST

देवगांव : येथील विद्युत रोहित्राच्या नियंत्रण पेटीची दुरवस्था झाली असून उघड्या पेटीमुळे दुर्घटना होण्याची भीती नागरिकांना वाटत असून रोहित्राचे ...

देवगांव : येथील विद्युत रोहित्राच्या नियंत्रण पेटीची दुरवस्था झाली असून उघड्या पेटीमुळे दुर्घटना होण्याची भीती नागरिकांना वाटत असून रोहित्राचे ठिकाण बदलण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. तसेच विद्युत रोहित्र उघडे असून, त्याचे फ्यूज फुटलेले आहे. आणि फक्त तुटक्या तांब्याच्या तारा फ्यूजआधारे वीजपुरवठा सुरू आहे. रोहित्राचे झाकण नियमित उघडे असल्याने या परिसरात अपघात होण्याचा धोका असल्याने महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने नवे फ्यूज बसविण्याची मागणी होत आहे.

पावसाळ्यात फ्यूज उडणे, ठिणगी पडणे, शॉर्ट सर्किट होणे आदी प्रकार होत असतात. त्यामुळे अनेकदा बत्ती गूल होऊन अंधाराचा सामना करावा लागतो. विद्युत रोहित्राची जागा रस्त्यालगत असून बाजूलाच भात शेतीची आवणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह जनावरांनाही धोका संभवून कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. यासाठी महावितरण कंपनीने या भोंगळ कारभाराकडे वेळीच लक्ष देऊन संभाव्य जीवितहानी टाळावी. रोहित्राच्या पेटीच्या दरवाजाचे, कडीकोंडे तुटक्या स्थितीत असून पूर्णपणे गंजलेल्या स्थितीत आहेत. या रोहित्रावरील लोखंडी आवरण नाहीसे झाल्याने पूर्ण रोहित्र उघडे पडले आहे. त्यामुळे महावितरणच्या रोहित्राची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांना, जनावरांना विजेचा धक्का लागून बळी जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

इन्फो...

डीपीची जागा बदलण्याची गरज

विद्युत रोहित्राच्या नियंत्रण पेटीची दुरवस्था झाल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. तसेच डीपीची जागा शेत परिसरात व वर्दळीच्या ठिकाणी असल्याने डीपीची जागा बदलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावाच्या दूरवर ठिकाणी डीपीची व्यवस्था केल्यास पावसाळ्यात होणाऱ्या शॉर्ट सर्किटमुळे नागरिक तसेच जनावरांना त्याचा धोका होणार नाही.

कोट...

डीपीच्या झाकणाची पावसामुळे गंजून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास फ्यूज टाकणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे विद्युत विभागाने नवीन नियंत्रण पेटी त्या ठिकाणी बसवावी. तसेच शेत परिसर व वर्दळीत असलेल्या रोहित्राची जागा बदलल्यास होणारा धोकादायक अनर्थ टळू शकतो.

- नामदेव दोंदे, देवगाव

120721\12nsk_22_12072021_13.jpg

रोहित्र