शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

‘लोकमत’च्या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभ्यासपूर्ण विवेचन

By admin | Updated: December 27, 2014 01:26 IST

देशात महाराष्ट्राला बनविणार रोलमॉडेल

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लोकमतच्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नाशिक’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त नाशिक शहरात प्रथमच आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी खास गप्पांचा कार्यक्रम ‘लोकमत’च्या व्यासपीठावर खुलला आणि शेती, सिंचनापासून ते उद्योग, शिक्षणापर्यंत अनेकविध प्रश्नांना फडणवीस यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. प्रत्येक विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन करताना फडणवीस यांनी देशात महाराष्ट्र राज्याला रोलमॉडेल बनविण्याबाबतची आपली महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली. हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये खास निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात फडणवीस यांची प्रगट मुलाखत लोकमतचे सहव्यवस्थापकीय व संपादकीय संचालक ऋषी दर्डा, समूह संपादक दिनकर रायकर आणि नाशिक आवृत्तीचे संपादक हेमंत कुलकर्णी यांनी घेतली. संपादकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या माऱ्यापुढे जराही न डगमगता फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करत यापुढे राज्य सरकारची नेमकी दिशा काय असेल, याचीही झलक दाखविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांना दिलेली उत्तरे त्यांच्याच शब्दांत...शाश्वत शेती विकासावर भर ४सरकारचा फोकस आजवर केवळ रिलिफवर राहिलेला आहे. वातावरणातील बदल याचा मुकाबला आपण करतो आहे. मागील सरकारने पाच वर्षांत रिलिफपोटी ८ हजार कोटी रुपये, तर शाश्वत शेती विकासासाठी एक हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर नुकसानीपोटी आम्ही त्यांना एक दशांशदेखील मदत देऊ शकत नाही. माझ्या मते, रिलिफ हा मुद्दा आहेच परंतु शाश्वत शेतीविकासही महत्त्वाचा आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात जी गारपीट झाली त्यात ज्या शेतकऱ्यांनी आच्छादने वापरली होती, त्यांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आच्छादनांबाबत मदतीचा विचार पुढे आला. परंतु सदर आच्छादने ही इटलीतून आयात केली जातात. त्यामुळे त्याचे आयातशुल्क कमी करता येईल काय, याचा विचार आम्ही करतो आहे. वातावरणातील बदल आता वास्तविकता मानून त्यापासून होणारा त्रास थांबविण्याचा विचार करायला हवा. महाराष्ट्रातील पाच हजार गावे एका वर्षात दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत संबंधित गावातील पाण्याचे आॅडिट करुन उपलब्ध पाणी कसे अडवता येईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. उपग्रहाच्या माध्यमातून पीकपाहणी करून नुकसानीचा अंदाज करता येईल काय, याचाही विचार सुरु आहे.