शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

विहिरींनी तळ गाठल्याने टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 22:32 IST

पाण्यासाठी भटकंती : आठ दिवसाआड पाणीपुरवठा

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे-फत्तेपूर परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने महिला व ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. जाम नदीवरील ग्रामपंचायत मालकीच्या सार्वजनिक पाण्याच्या विहिरीनेही केव्हाच तळ गाठला असून, निऱ्हाळेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. निऱ्हाळे-फत्तेपूर गावासाठी प्रशासनाकडून दररोज टॅँकरच्या दोन खेपांनी पाणीपुरवठा केला जात असला तरी त्यात गावाची तहान भागत नसल्याने टॅँकरच्या खेपा वाढवून मिळाव्यात, अशी मागणी सरपंच प्रकाश दराडे, उपसरपंच गंगूबाई जाधव, सदस्य योगेश सांगळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. टॅँकरचे पाणी सार्वजनिक विहिरीत टाकून सार्वजनिक त्याद्वारे गावात पाणीपुरवठा केला जातो. त्यात दररोज एकेक गल्लीस पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे त्याच गल्लीला पुन्हा आठवड्यातून एकदा पाणी मिळते. गावात चार दिवसांवर म्हसोबा महाराज यात्रोत्सव व त्यानंतर ग्रामदैवत शनैश्चर महाराज यांचा यात्रोत्सव येऊन ठेपला असून, पाहुण्यांची वर्दळ वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर त्वरित पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरच्या फेऱ्या वाढवून मिळाव्यात, अशी मागणी सरपंच दराडे यांच्यासह सीताराम कटारनवरे, अण्णा काकड, शोभा शिंदे, सुनीता सांगळे, सविता सांगळे, आशा काकड, राजेंद्र वाघ, सुरेश कातकाडे, देवीदास वाघ, सुभाष यादव, सोपान काकड यांच्यासह ग्रामस्थ व महिलांनी केली आहे. (वार्ताहर)