शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तिनाथांच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 18:11 IST

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचा जयघोष करत हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने वाजत-गाजत निवृत्तिनाथांच्या पालखीने विठूमाउलीच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. १८) पंढरपूरकडे प्रस्थान केले आणि गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली पायी दिंडी सोहळ्याची प्रतीक्षाही संपली.

ठळक मुद्देपंढरपूरकडे मार्गस्थ : हजारो वारकरी सहभागी; ४५० किमीचा प्रवास

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचा जयघोष करत हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने वाजत-गाजत निवृत्तिनाथांच्या पालखीने विठूमाउलीच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. १८) पंढरपूरकडे प्रस्थान केले आणि गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली पायी दिंडी सोहळ्याची प्रतीक्षाही संपली.संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरी दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी निवृत्तिनाथांच्या पादुका मंदिराबाहेर आणण्यात आल्या. पूजा, आरती, अभंग आदी विधी पार पाडल्यानंतर वारकऱ्यांनी संत निवृत्तिनाथांचा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. पुंडलिक वरदा श्रीहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, संत निवृत्तिनाथ महाराज की जय असा जयजयकार करत रथ हलला. पालखी रथाला सुनील अडसरे यांच्या बैलजोडीला मान मिळाला, तर रथाचे सारथ्य बाळासाहेब अडसरे व अजय अडसरे हे बंधू करत आहेत. पायी दिंडीने प्रवास करणे हे केवळ मौज मजा करून प्रवास नव्हे, तर ती एक साधना आहे. अशी धारणा असल्याने या दिंडीत हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. सकाळी कुशावर्ताजवळ रथ आल्यानंतर नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी चांदीच्या पादुका डोक्यावर घेऊन कुशावर्त तीर्थावर सपत्नीक पूजा केली. यावेळी सर्व नगरसेवकांसह मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे उपस्थित होते. तेथून भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन पालखी नाशिककडे मार्गस्थ झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वारकºयांच्या नातेवाइकांशी भेटीगाठीचा कार्यक्रम पार पडला. हा दिंडी सोहळा २४ दिवसांच्या पायी प्रवासाचा राहणार असून, सुमारे ४५० किमी अंतर कापणार आहे. भावभक्तिमय वातावरणात निघालेल्या या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत केले जाणार असून, निर्मळ वारी उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचादेखील संदेश दिला जाणार आहे.आज नाशिकला आगमनदुपारी १२.३० वाजता पालखीने त्र्यंबकेश्वर सोडले. मंगळवारी पालखीचा पहिला मुक्काम नाशिक येथे सातपूरला पडणार आहे. २० जूनला पालखीचा पळसे येथे मुक्काम होईल. पंढरपूर वारी १२ जुलै रोजी असल्याने १२ ते १५ जुलैदरम्यान पालखीचा मुक्काम पंढरपूर येथे त्र्यंबकेश्वर फडावर राहील. २४ दिवसांचा प्रवास केल्यानंतर वारी करून पालखीचा परतीचा प्रवास १६ जुलैपासून सुरू होईल. सतराव्या दिवशी पालखी त्र्यंबकेश्वरला येईल. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरReligious programmeधार्मिक कार्यक्रम