शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

बदल्यांचे अधिकार विभागीय आयुक्तांना

By admin | Updated: June 24, 2016 00:31 IST

दिलासा : तहसीलदार, उपजिल्हाधिकारी बदल्या

नाशिक : तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे महसूलमंत्र्यांकडे असलेले अधिकार शासनाने आता त्या त्या विभागीय आयुक्तांना बहाल केले असून, त्याबाबतचे आदेश बुधवारी शासनाने जारी केले आहेत. या आदेशामुळे मंत्रालयातील ‘भेटी-गाठी’ संस्कृतीला चाप बसणार असल्याने अधिकारीवर्गाला दिलासा मिळाला आहे. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यातील ११० तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी सदर बदलीचे प्रस्ताव फेटाळून लावत प्रशासन मंडळाकडून या प्रस्तावांची छाननी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सोयीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला असून, प्रशासन मंडळानेदेखील सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून ज्यांना तीन वर्षे पूर्ण झाले वा मार्च २०१७ पर्यंत तीन वर्षे पूर्ण होणार आहेत, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गुणवत्तेवरच आता जे खरोखर बदली पात्र आहेत, अशांच्याच बदल्या होणार असल्या तरी, गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन मंडळाला डावलून थेट मंत्र्यांकडून केल्या जाणाऱ्या बदल्यांची प्रथा बंद करण्यात आली आहे. बुधवारी शासनाने या संदर्भातील अधिकार विभागीय आयुक्तांना बहाल करून तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्यांबाबत दरवर्षी जानेवारी महिन्यातच प्रस्ताव तयार करून ३१ मे पूर्वी बदल्या करण्यात याव्यात अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अशा बदल्या करताना बदल्यांच्या कायद्याचा भंग होणार नाही तसेच एखाद्या अधिकाऱ्याची विशेष कारणास्तव बदली करावयाची असेल तर त्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव सादर करावा व बदली करण्यामागच्या कारणांची मिमांसा करणे क्रमप्राप्त ठरविण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, लवकरच बदल्या होतील, अशी अपेक्षा आहे.