शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

डेंग्यूचा मुक्काम हटता हटेना!

By admin | Updated: August 18, 2016 01:12 IST

नाशिककर हैराण : उपाययोजनांमध्ये मनपाची आरोग्य यंत्रणा थिटी

 नाशिक : यापूर्वी डेंग्यूच्या आजाराची तीव्रता नाशिककरांनी कधी अनुभवलेली नव्हती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून डेंग्यूने शहरात मुक्काम ठोकलेला असून, त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा थिटी पडली आहे. स्वच्छ पाण्यात एडिस एजिप्ताय जातीच्या डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यूची लागण होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत घरभेटी देण्याचा कार्यक्रम राबविला जातो. परंतु, अपुरे मनुष्यबळ पाहता सदर घरभेटी केवळ औपचारिकताच दिसून येत आहे. यावर्षी जानेवारी ते १५ आॅगस्ट या साडेसात महिन्यांच्या कालावधीत ३४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद वैद्यकीय विभागात असली तरी प्रत्यक्ष आकडा अधिक असण्याची शक्यता आहे.डेंग्यूचा मुक्काम हटता हटेना!नाशिककर हैराण : उपाययोजनांमध्ये मनपाची आरोग्य यंत्रणा थिटीनाशिक : यापूर्वी डेंग्यूच्या आजाराची तीव्रता नाशिककरांनी कधी अनुभवलेली नव्हती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून डेंग्यूने शहरात मुक्काम ठोकलेला असून, त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा थिटी पडली आहे. स्वच्छ पाण्यात एडिस एजिप्ताय जातीच्या डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यूची लागण होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत घरभेटी देण्याचा कार्यक्रम राबविला जातो. परंतु, अपुरे मनुष्यबळ पाहता सदर घरभेटी केवळ औपचारिकताच दिसून येत आहे. यावर्षी जानेवारी ते १५ आॅगस्ट या साडेसात महिन्यांच्या कालावधीत ३४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद वैद्यकीय विभागात असली तरी प्रत्यक्ष आकडा अधिक असण्याची शक्यता आहे.शहरात डेंग्यूच्या आजाराने कधीही प्रदीर्घ काळ मुक्काम ठोकल्याचे उदाहरण नाही. सन २०१३ पासून शहरात डेंग्यूच्या आजाराची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. त्यावेळी ५९७ रुग्णांपैकी २५१ रुग्णांना डेंग्यूच्या आजाराची लागण झाली होती तर पाच जणांना प्राण गमवावे लागले होते. २०१४ मध्ये मात्र डेंग्यूच्या आजाराची भयावहता वाढली. वर्षभरात १०८७ रुग्ण संशयित म्हणून आढळून आले होते, तर ४६० रुग्णांना डेंग्यूची लागण होऊन ७ जणांचा बळी गेला होता. याच काळात पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यावरून महापालिकेत घोळ सुरू झाला होता. सन २०१५ मध्येही डेंग्यूचा मुक्काम कायम राहिला. यावर्षी ९३९ संशयितांच्या रक्तनमुन्यांची तपासणी करण्यात आली असता ३२८ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर तिघांना आपला जीव गमवावा लागला होता. यंदा जानेवारी ते १५ आॅगस्ट २०१६ या कालावधीत ३४१ रुग्णांना डेंग्यूने पछाडल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने डेंग्यूच्या आजाराचा सामना नाशिककर करत आले आहेत, परंतु त्यावर प्रभावी उपाययोजना राबविण्यात महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणा जशी अपयशी ठरली तशी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्तीही कमी पडली. डेंग्यूच्या आजाराविषयी महासभांमध्ये केवळ चर्चांचे फड रंगविले गेले, परंतु त्या तुलनेत प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्यात आरोग्य व वैद्यकीय विभागाची यंत्रणा थिटी पडली. यावर्षी तर डेंग्यूबरोबरच शहरात वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या आजारांचाही सामना नाशिककरांना करावा लागतो आहे. यंदा कधी नव्हे एवढा डासांचा उपद्रव नागरिकांना सहन करावा लागला आहे. राजकीय पक्ष-संघटना, लोकप्रतिनिधींनी आरोग्याधिकाऱ्याला मच्छरदाणी, महापौरांना कचऱ्याची फोटोफ्रेम देत या आजाराच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधितांची आंदोलनेही केवळ फोटोसेशनपुरताच मर्यादित राहिली. ठोस उपाययोजनेत मात्र महापालिकेचा आरोग्य व वैद्यकीय विभाग अजूनही चाचपडतोच आहे. (क्रमश:)