शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
3
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
4
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
5
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
6
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
7
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
8
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
9
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
10
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
11
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
12
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
13
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
14
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
15
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
16
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
17
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
18
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
19
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
20
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
Daily Top 2Weekly Top 5

महिनाअखेरीस टॅँकरची मागणी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:14 IST

यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा असला तरी, सन २०२० च्या तुलनेत काहीसा कमी आहे. तरीदेखील पिण्यासाठी पुरेसे ...

यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा असला तरी, सन २०२० च्या तुलनेत काहीसा कमी आहे. तरीदेखील पिण्यासाठी पुरेसे पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. तथापि, जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पाणी साठवणुकीची पुरेशी साधने नसल्याने या तालुक्यांमध्ये दरवर्षीच पाण्याची टंचाई भासते. त्याचबरोबर टंचाई पाचवीला पुजलेल्या बागलाण, नांदगाव, मालेगाव, देवळा या तालुक्यांना दरवर्षीच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. यंदा मार्च उजाडला तरी, अद्याप पाण्यासाठी फारशी ओरड नसली तरी, सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, यंदा हवामान खात्याने उन्हाळा कडक असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत नद्या, नाल्यांची पाणीपातळी कमी होऊन शेतकऱ्यांच्या विहिरीही तळ गाठू लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचा हंगामही संपुष्टात येत असल्याने शेतीसाठी पाण्याची गरज जवळपास संपली आहे. मात्र उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास मार्च अखेरीस पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्ह्याचा संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, उन्हाळ्यात ६०४ गावे व ७१८ वाड्या अशा प्रकारे एकूण १३२२ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. त्यावर उपाययोजनासाठी अकरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. टंचाई कृती आराखड्यानुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांतील एकाही कामाचे प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी आराखडा कागदावरच राहिला आहे.

-------

जिल्ह्यातील एकूण गावे - १९१७

बोरअरवेलची दुरुस्ती होणार - ८

पाणीटंचाईची समस्या भेडसावणारी गावे - १३२२

बोअरवेलचे जिल्ह्यात खोदकाम होणार - २४४

पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती करणार - १४

नळयोजनेचा पूर्ण करणार - ६५

--------

आराखड्यात होणार १४९५ कामे

टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात १४९५ कामे केली जाणार असून, त्यात प्रगतीतील नळयोजना पूर्ण करणे, विंधन विहिरी घेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरती पूरक नळयोजना राबविणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, विहिरी खोल करणे, बुडक्या घेणे, खासगी विहिरी अधिग्रहित करण्याची कामे केली जाणार असून, या उपरही पाणीटंचाईची समस्या दूर न झाल्यास टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

-------

८६१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणार

जिल्ह्यातील १३२२ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून सर्व उपाययोजना राबवूनही ज्या गावांमध्ये पाण्याचे स्रोत नाहीत अशी ८६१ गावे, वाड्यांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

--------

धरणातील पाण्याचे नियोजन

जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणांमध्ये सध्या ५८ टक्के इतका जलसाठा असून, यातील सिंचनाचे आरक्षण वगळता उर्वरित पाण्याचे पिण्यासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यात कालव्याद्वारे नळपाणी योजनांसाठी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

-------

२६० विहीरींचे अधिग्रहण करणार

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत नाहीत अशा गावांमध्ये शेतकऱ्यांकडील खासगी विहिरी अधिग्रहित करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यात १८५ गावे व ७५ वाड्यांमधील २६० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्या मोबदल्यात विहीरमालकाला मोबदला अदा करण्यात येणार आहे.