शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

महिनाअखेरीस टॅँकरची मागणी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:14 IST

यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा असला तरी, सन २०२० च्या तुलनेत काहीसा कमी आहे. तरीदेखील पिण्यासाठी पुरेसे ...

यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा असला तरी, सन २०२० च्या तुलनेत काहीसा कमी आहे. तरीदेखील पिण्यासाठी पुरेसे पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. तथापि, जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पाणी साठवणुकीची पुरेशी साधने नसल्याने या तालुक्यांमध्ये दरवर्षीच पाण्याची टंचाई भासते. त्याचबरोबर टंचाई पाचवीला पुजलेल्या बागलाण, नांदगाव, मालेगाव, देवळा या तालुक्यांना दरवर्षीच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. यंदा मार्च उजाडला तरी, अद्याप पाण्यासाठी फारशी ओरड नसली तरी, सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, यंदा हवामान खात्याने उन्हाळा कडक असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत नद्या, नाल्यांची पाणीपातळी कमी होऊन शेतकऱ्यांच्या विहिरीही तळ गाठू लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचा हंगामही संपुष्टात येत असल्याने शेतीसाठी पाण्याची गरज जवळपास संपली आहे. मात्र उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास मार्च अखेरीस पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्ह्याचा संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, उन्हाळ्यात ६०४ गावे व ७१८ वाड्या अशा प्रकारे एकूण १३२२ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. त्यावर उपाययोजनासाठी अकरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. टंचाई कृती आराखड्यानुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांतील एकाही कामाचे प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी आराखडा कागदावरच राहिला आहे.

-------

जिल्ह्यातील एकूण गावे - १९१७

बोरअरवेलची दुरुस्ती होणार - ८

पाणीटंचाईची समस्या भेडसावणारी गावे - १३२२

बोअरवेलचे जिल्ह्यात खोदकाम होणार - २४४

पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती करणार - १४

नळयोजनेचा पूर्ण करणार - ६५

--------

आराखड्यात होणार १४९५ कामे

टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात १४९५ कामे केली जाणार असून, त्यात प्रगतीतील नळयोजना पूर्ण करणे, विंधन विहिरी घेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरती पूरक नळयोजना राबविणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, विहिरी खोल करणे, बुडक्या घेणे, खासगी विहिरी अधिग्रहित करण्याची कामे केली जाणार असून, या उपरही पाणीटंचाईची समस्या दूर न झाल्यास टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

-------

८६१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणार

जिल्ह्यातील १३२२ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून सर्व उपाययोजना राबवूनही ज्या गावांमध्ये पाण्याचे स्रोत नाहीत अशी ८६१ गावे, वाड्यांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

--------

धरणातील पाण्याचे नियोजन

जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणांमध्ये सध्या ५८ टक्के इतका जलसाठा असून, यातील सिंचनाचे आरक्षण वगळता उर्वरित पाण्याचे पिण्यासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यात कालव्याद्वारे नळपाणी योजनांसाठी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

-------

२६० विहीरींचे अधिग्रहण करणार

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत नाहीत अशा गावांमध्ये शेतकऱ्यांकडील खासगी विहिरी अधिग्रहित करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यात १८५ गावे व ७५ वाड्यांमधील २६० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्या मोबदल्यात विहीरमालकाला मोबदला अदा करण्यात येणार आहे.