शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

भोजापूर धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:14 IST

भोजापूर धरणात आजमितीस ४० टक्के म्हणजे १४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरात पावसाचे प्रमाण जास्त ...

भोजापूर धरणात आजमितीस ४० टक्के म्हणजे १४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने बळीराजा सुखावला होता. परंतु दोन वर्षांच्या काळात अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस, विविध रोगांचे संक्रमण तसेच पिकांना कवडीमोल भाव यामुळे पाण्याची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले होते. यावर्षी भोजापूर धरण भरण्याच्या अगोदरच परिसरातील सर्व बंधारे, पाझरतलाव, केटीवेअर, गावतळे, विहिरी पूर्णपूणे भरली होती, त्यामुळे गतवर्षी पाण्याची अडचण आली नव्हती. भोजापूर धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन १० फेब्रुवारीला सोडण्यात आले होते. सोडलेल्या आवर्तनातून दोन्ही तालुक्यातील एक हजारच्या आसपास हेक्टरवरील सिंचनाचा लाभ झाला होता. सुमारे वीस दिवस आवर्तन सुरू होते.

मार्च महिन्याच्या मध्यंतरी परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने वाडीवस्त्यांवर तसेच शेतशिवारात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे परिसरातील पाझर तलावात भोजापूर धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

चौकट-

जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात पाण्याची पातळी चांगल्या प्रमाणात असल्याने रब्बी हंगामात पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून मागणी नव्हती. परंतु गेल्या महिन्यात परिसरात पाणी टंचाई जाणवू लागल्याने बंधारे कोरडेठाक पडल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी लक्ष घालून धरणातून उन्हाळी आवर्तन सोडावे.

- नागेश शेळके, शेतकरी.