शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

भोजापूर धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:14 IST

भोजापूर धरणात आजमितीस ४० टक्के म्हणजे १४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरात पावसाचे प्रमाण जास्त ...

भोजापूर धरणात आजमितीस ४० टक्के म्हणजे १४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने बळीराजा सुखावला होता. परंतु दोन वर्षांच्या काळात अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस, विविध रोगांचे संक्रमण तसेच पिकांना कवडीमोल भाव यामुळे पाण्याची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले होते. यावर्षी भोजापूर धरण भरण्याच्या अगोदरच परिसरातील सर्व बंधारे, पाझरतलाव, केटीवेअर, गावतळे, विहिरी पूर्णपूणे भरली होती, त्यामुळे गतवर्षी पाण्याची अडचण आली नव्हती. भोजापूर धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन १० फेब्रुवारीला सोडण्यात आले होते. सोडलेल्या आवर्तनातून दोन्ही तालुक्यातील एक हजारच्या आसपास हेक्टरवरील सिंचनाचा लाभ झाला होता. सुमारे वीस दिवस आवर्तन सुरू होते.

मार्च महिन्याच्या मध्यंतरी परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने वाडीवस्त्यांवर तसेच शेतशिवारात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे परिसरातील पाझर तलावात भोजापूर धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

चौकट-

जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात पाण्याची पातळी चांगल्या प्रमाणात असल्याने रब्बी हंगामात पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून मागणी नव्हती. परंतु गेल्या महिन्यात परिसरात पाणी टंचाई जाणवू लागल्याने बंधारे कोरडेठाक पडल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी लक्ष घालून धरणातून उन्हाळी आवर्तन सोडावे.

- नागेश शेळके, शेतकरी.