शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

कांद्याचे किमान निर्यातमूल्य दोनशे डॉलर करण्याची मागणी

By admin | Updated: December 12, 2015 22:49 IST

लासलगाव : कपात पुरेशी नसल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

लासलगाव : कांद्याचे निर्यातमूल्य कमी करून चारशे डॉलरपर्यंत झाले तरी पुरेसे कमी झाले नसल्याने ते दोनशे डॉलरपर्यंत कमी करण्याची मागणी होत आहे.वाढती महागाई आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करीत कष्टाने पिकविलेल्या लाल कांद्याचे भाव कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. लाल कांदा साठवून ठेवता येत नसल्याने विकण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे नाही. गारपीट, पाणीटंचाई, विजेचे वाढते भारनियमन, खतांच्या व औषधांच्या वाढत्या किमती आणि बनावट बियाणे, औषधांचा सुळसुळाट, मजुरांची टंचाई यांसह असंख्य समस्या शेतकऱ्यांपुढे उभ्या आहेत. कांदा लागवडीसाठी येणारा खर्च विचारात घेतला तर एकीकडे बियाणे खरेदीपासून ते लागवड, खते, औषधे, निंदणी, काढणी, वाहतूक, लागवडीपूर्वीची मशागत असा खर्च सरासरी ८०ते८५ हजार रुपये येतो.या व्यतिरिक्त शेतकऱ्यांची मेहनत (पिकांना पाणी देणे, फवारणी करणे, खते टाकणे, मशागत आदि) खर्च विचारात धरता एक एकरात साधारण १२० क्विंटल कांद्याचे उत्पादन गृहीत धरून आजच्या बाजारभावाची तुलना केल्यास ५० ते ६० हजार रुपयेहोतात. त्यात कांदा लिलावासाठीची वाहतूक आणि आडत, हमाली यांचा विचार केला तर झालेल्या खर्चाचा ताळमेळ होत नाही. कांदा पिकासाठी शेतकऱ्यांनी केलेली मेहनत वाया जाताना दिसत आहे. असे असतानाही तालुक्यात उन्हाळ कांद्याची लागवड मात्र जोरात सुरू आहे.यावर्षी शेतकऱ्यांनी लाल कांद्याची दोन हजार १२७ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली होती, तर उन्हाळ कांद्यासाठी ३२ हेक्टर क्षेत्र गृहीत धरण्यात आली आहे. लाल कांदा काढणीचा, तर उन्हाळ कांदा लागवडीचा हंगाम ऐन बहरात असून, तालुक्यातील शेतकऱ्यांचा दररोज सरासरी ७० हजार क्विंटल कांदा लिलावासाठी येत आहे. यात दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. तशीच कांदा बाजारभावाची-देखील घसरण होताना दिसत आहे. यावर्षी निफाड तालुक्यात २६८ हेक्टर क्षेत्रावर लाल कांद्याची, तर दोन हजार १२७ हेक्टर क्षेत्रावर पोळ कांद्याची लागवड झाली होती. हा कांदा आता मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारपेठेत येत आहे. लाल व रांगडा कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांदा लागवडीचे क्षेत्र मोठे असल्याने या कांद्याचेदेखील उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे किमान कांदामूल्याची अट हटविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)