शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी

By admin | Updated: September 11, 2014 00:18 IST

कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी

दाभाडी : केंद्र सरकारच्या निर्यातबंदी निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. कांदा पिकावर वर्षभराची आर्थिक समीकरणे जुळविणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कांदा निर्यातबंदी उठवावी, असे आवाहन दाभाडी परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे.कसमादे पट्टा डाळिंबाचे कोठार म्हणून ओळखले जात होते. परंतु तेल्या व मर रोगामुळे डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. परिणामी दाभाडी परिसरातील शेतकरी कांदा लागवडीकडे वळाला. कांद्याला एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो; परंतु मिळणारे बाजारभाव पाहता यातुन खर्चही भरून निघणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात संतापाची लाट पसरली आहे.कांदा उत्पादन हे तीन हंगामात घेतले जाते. पोळ कांदा, रांगडा कांदा व उन्हाळ कांद्याची टप्प्याटप्प्याने लागवड केली जाते. साधारणत: एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. ५० ते ६० क्विंटल उत्पादन पोळ कांद्यापासून मिळते. रांगडा कांद्याच्या तुलनेत उन्हाळी कांद्याचे उत्पादन अधिक होते. उन्हाळ कांदा साठवून ठेवणे शक्य आहे; परंतु पोळ कांदा जास्त दिवस साठवता येत नाही. तरी शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करत आहेत. (वार्ताहर)