शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी

By admin | Updated: September 11, 2014 00:18 IST

कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी

दाभाडी : केंद्र सरकारच्या निर्यातबंदी निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. कांदा पिकावर वर्षभराची आर्थिक समीकरणे जुळविणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कांदा निर्यातबंदी उठवावी, असे आवाहन दाभाडी परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे.कसमादे पट्टा डाळिंबाचे कोठार म्हणून ओळखले जात होते. परंतु तेल्या व मर रोगामुळे डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. परिणामी दाभाडी परिसरातील शेतकरी कांदा लागवडीकडे वळाला. कांद्याला एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो; परंतु मिळणारे बाजारभाव पाहता यातुन खर्चही भरून निघणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात संतापाची लाट पसरली आहे.कांदा उत्पादन हे तीन हंगामात घेतले जाते. पोळ कांदा, रांगडा कांदा व उन्हाळ कांद्याची टप्प्याटप्प्याने लागवड केली जाते. साधारणत: एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. ५० ते ६० क्विंटल उत्पादन पोळ कांद्यापासून मिळते. रांगडा कांद्याच्या तुलनेत उन्हाळी कांद्याचे उत्पादन अधिक होते. उन्हाळ कांदा साठवून ठेवणे शक्य आहे; परंतु पोळ कांदा जास्त दिवस साठवता येत नाही. तरी शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करत आहेत. (वार्ताहर)