शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

ग्रामीण भागात बसेसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:23 IST

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा होणारच असल्याने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाणे क्रमप्राप्त आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ ...

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा होणारच असल्याने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाणे क्रमप्राप्त आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरूच ठेवलेले होते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिक्षण घेण्यात अडचणींचा सामोरे जावे लागले. ग्रामीण भागातील मोबाइल नेटवर्क प्रॉब्लेम, त्यातच आधी संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गांकडे अँड्रॉईड मोबाइलचा अभाव आणि नियमित शेती कामे यांमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसमध्ये जॉईन होणे अवघड होत होते. मार्चपासून सुरू होत असलेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थी यांनीही ऑनलाइनपेक्षा प्रत्यक्ष ऑफलाइन अध्यापनालाच पसंती दिली आहे. त्यासाठी महाविद्यालयात जाण्याची इच्छा आहे पण जाण्याची सोय नसल्याने अडचण होत आहे.

खेडलेझुंगे, रुई, कोळगाव, कानळद, धारणगाव वीर व खडक, सारोळेथडी या गावातील बहुसंख्य विद्यार्थी हे लासलगाव, विंचूर व निफाडसारख्या मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी नियमित ये-जा करीत असतात. लॉकडाऊनच्याआधी परिसरातून एसटीच्या ६ फेऱ्या व्हायच्या. सध्या लॉकडाऊन संपुष्टात येऊनही परिसरात एसटीच्या फक्त दोनच फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्या फेऱ्या सकाळी ९ आणि सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास असल्याने विद्यार्थी, शेतकरी यांच्या सोयीनुसार नाहीत.

लासलगाव- नैताळे- खेडलेझुंगे या मार्गावरुन सध्या सुरू असलेल्या २ फेऱ्यांऐवजी पूर्वीप्रमाणे बसेसच्या ६ फेऱ्या करण्यात याव्यात, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.

सकाळी ९ च्या बसने मुले लासलगाव, विंचूर, निफाड, नाशिक येथे शिक्षणासाठी गेल्यास त्यांना घरी येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तसेच शाळा, महाविद्यालये सकाळी ८ पर्यंत सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या वेळेची सांगड घालून बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी पालकवर्गाने केली आहे.

===Photopath===

040221\04nsk_17_04022021_13.jpg

===Caption===

बस