शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

उन्हाळी सुट्टी घोषित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:14 IST

मालेगाव : राज्यात कोरोनामुळे काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन अध्यापन करावे लागत असून, राज्य शासनाने सर्व शाळांना ...

मालेगाव : राज्यात कोरोनामुळे काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन अध्यापन करावे लागत असून, राज्य शासनाने सर्व शाळांना ऑनलाईन अध्यापन बंद करून वार्षिक निकाल पत्रक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ३० एप्रिलपूर्वी निकाल घोषित करून २ मेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मार्च २०२०पासून शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात मध्यंतरीच्या काळात मुंबई जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांत शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यात आली होती; परंतु कोरोना संक्रमणाची दुसरी लाट पाहता, पुन्हा एकदा संपूर्ण राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. एप्रिल २०२०पासून ऑनलाईन अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित नसले, तरी ऑनलाईन माध्यमातून शिक्षणाची प्रक्रिया निरंतर सुरु होती. मागील वर्षभरापासून शिक्षक ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन करत आहेत. आता पहिली ते नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम आणि उजळणी पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना पहिली ते नववी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल पत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन अध्ययन - अध्यापन तासिका बंद करुन विद्यार्थ्यांचा निकाल ३० एप्रिल २०२१पूर्वी घोषित करण्याबाबत निर्देश द्यावेत व २ मे २०२१पासून सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.