शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुट्टी घोषित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:14 IST

मालेगाव : राज्यात कोरोनामुळे काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन अध्यापन करावे लागत असून, राज्य शासनाने सर्व शाळांना ...

मालेगाव : राज्यात कोरोनामुळे काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन अध्यापन करावे लागत असून, राज्य शासनाने सर्व शाळांना ऑनलाईन अध्यापन बंद करून वार्षिक निकाल पत्रक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ३० एप्रिलपूर्वी निकाल घोषित करून २ मेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मार्च २०२०पासून शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात मध्यंतरीच्या काळात मुंबई जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांत शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यात आली होती; परंतु कोरोना संक्रमणाची दुसरी लाट पाहता, पुन्हा एकदा संपूर्ण राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. एप्रिल २०२०पासून ऑनलाईन अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित नसले, तरी ऑनलाईन माध्यमातून शिक्षणाची प्रक्रिया निरंतर सुरु होती. मागील वर्षभरापासून शिक्षक ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन करत आहेत. आता पहिली ते नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम आणि उजळणी पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना पहिली ते नववी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल पत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन अध्ययन - अध्यापन तासिका बंद करुन विद्यार्थ्यांचा निकाल ३० एप्रिल २०२१पूर्वी घोषित करण्याबाबत निर्देश द्यावेत व २ मे २०२१पासून सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.