शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

उन्हाळी सुट्टी घोषित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:14 IST

मालेगाव : राज्यात कोरोनामुळे काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन अध्यापन करावे लागत असून, राज्य शासनाने सर्व शाळांना ...

मालेगाव : राज्यात कोरोनामुळे काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन अध्यापन करावे लागत असून, राज्य शासनाने सर्व शाळांना ऑनलाईन अध्यापन बंद करून वार्षिक निकाल पत्रक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ३० एप्रिलपूर्वी निकाल घोषित करून २ मेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मार्च २०२०पासून शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात मध्यंतरीच्या काळात मुंबई जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांत शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यात आली होती; परंतु कोरोना संक्रमणाची दुसरी लाट पाहता, पुन्हा एकदा संपूर्ण राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. एप्रिल २०२०पासून ऑनलाईन अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित नसले, तरी ऑनलाईन माध्यमातून शिक्षणाची प्रक्रिया निरंतर सुरु होती. मागील वर्षभरापासून शिक्षक ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन करत आहेत. आता पहिली ते नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम आणि उजळणी पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना पहिली ते नववी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल पत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन अध्ययन - अध्यापन तासिका बंद करुन विद्यार्थ्यांचा निकाल ३० एप्रिल २०२१पूर्वी घोषित करण्याबाबत निर्देश द्यावेत व २ मे २०२१पासून सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.