शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलण्याची मागणी

By admin | Updated: October 10, 2015 23:04 IST

जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलण्याची मागणी

घोटी : शासन पाणीटंचाई वर मात करण्यासाठी राज्यभर जलयुक्त शिवार अभियान राबवीत असून, हे अभियान राबविताना शासनाने जे निकष ठरवले आहेत ते आदिवासी तालुक्यावर अन्यायकारक असल्याने शासनाने हे निकष बदलून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर यासारख्या आदिवासी तालुक्याचा या अभियानात समावेश होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.दरम्यान आदिवासी तालुक्याचा या अभियानात समावेश होण्यासाठी शासनाने पन्नास टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असावी हि जाचक अट वगळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शासन सर्वासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र या धोरणानुसार राज्यात सर्वत्र जलयुक्त शिवार अभियान राबवीत आहे. कृषी विभागाकडून राबविल्या जाणा-या या अभियानात शिवार गाव निवडीच्या निकषानुसार आदिवासी भागावर पूर्णपणे अन्याय झाला आहे. संपूर्ण आदिवासी उपाय योजना क्षेत्र हे डोंगर द-यानी व्यापलेले असल्याने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो.पण सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशात केवळ भात, नागली, वरई आदी पिके घेतली जातात. पाऊस जास्त असल्यामुळे आपोआपच पिके पन्नास पैसे आणेवारी पेक्षा जास्त येत असतात. मात्र लागवडीलायक क्षेत्र अल्प प्रमाणात असते. ते दरडोई उत्पन्न दहा हजार रुपयापेक्षा कमी असते. विशेष म्हणजे कोकण प्रदेशातील ठाणे, पालघर व उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आदिवासी उपाययोजनातील प्रदेश हा बेसोल्ट प्रकारचा खडक असल्याने पाणी अडवा पाणी जिरवा तसेच पाणलोट क्षेत्र विकास म्हणजे पायथा ते माथा हा प्रकार या भागात काहीच उपयोगाचा नसल्यामुळे पन्नास टक्के पाणलोटातील गाव हा निकष या भागात पूर्ण होऊ शकत नाही. दरम्यान इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही आदिवासी तालुके या निकषात बसत नसल्याने शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानापासून वंचित राहणार आहे. परिणामी प्रचंड पाउस पडूनही केवळ नियोजनाच्या अभावी या दोन्ही तालुक्याला पाणीटंचाई चा केविलवाणा सामना करावा लागत आहे. दोन्ही तालुक्यात कामे करण्यात यावी अशी मागणी आमदार निर्मला गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)