शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विनाकारण फिरणारांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:14 IST

फिरत्या विक्रेत्यांची संख्या झाली कमी नाशिक : राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केल्यामुळे फिरत्या भाजीविक्रेत्यांची संख्या कमी झाली असल्याचे ...

फिरत्या विक्रेत्यांची संख्या झाली कमी

नाशिक : राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केल्यामुळे फिरत्या भाजीविक्रेत्यांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीमध्येही किरकोळ विक्रेत्यांना बंदी केली असल्याने त्यांना माल मिळण्यासही अडचणी येत आहेत इतरवेळी परिसरात अनेक भाजीविक्रेते दिसतात सध्या मात्र महिलांना आपल्या परिसरात भाजीविक्रेता येण्याची वाट पहावी लागत आहे.

मनपाला फलक लावण्याचा विसर

नाशिक : शहरातील अनेक परिसरांत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक घरांमध्ये रुग्ण असले तरी महापालिकेच्या वतीने कोठेही निषिद्ध क्षेत्राचा फलक लावलेला नाही यामुळे अनेकांची दिशाभूल होते. मागीलवर्षी मनपातर्फे रुग्ण सापडल्यानंतर लगेच त्या ठिकाणी फलक लावले जात होते. यावर्षी मात्र मनपाला या कामाचा विसर पडला आहे.

भुरट्या चोरांवर कारवाईची मागणी

नाशिक : लॉकडाउनच्या काळातही शहरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसांचे या चोरांकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. किरकोळ चोऱ्यांची पोलिसांत नोंदही केली जात नसल्याने या चाेरांचे फावते याबाबत कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मशागतीच्या कामांना वेग

नाशिक : ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला असून, नांगरणी आणि इतर कामे उरकण्यात शेतकरी व्यस्त आहेत. यावर्षी ट्रॅक्टरचालकांनी नांगरणीचे दर वाढविले असल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हामुळे अनेक शेतकरी दुपारच्या आतच कामे उरकत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

वस्तूंची कृत्रिम टंचाई

नाशिक : कोरोनामुळे अनेक वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असून, अनेक विक्रेते या वस्तूंची अवाच्या सवा दराने विक्री करीत आहेत यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशा विक्रेत्यांना कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.