शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पावसाळ्यापूर्वी कामे सुरू करण्यास दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST

पंचवटीत दरवर्षी पावसाळ्यात ठिकठिकाणी गटार, नाले तुडुंब भरून पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते, तर काही ठिकाणी साचते. कधी कधी ...

पंचवटीत दरवर्षी पावसाळ्यात ठिकठिकाणी गटार, नाले तुडुंब भरून पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते, तर काही ठिकाणी साचते. कधी कधी नागरिकांच्या घरात शिरते. गावठाण व झोपडपट्टी भागात अशी परिस्थिती असली तरी मात्र त्याकडे मनपा संबंधित विभागाचे लक्ष जात नाही. प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिकांना जोरदार पाऊस झाल्यास धोका कायम संभावतो. दाट लोकवस्ती व गावठाण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटीत असलेल्या गजानन चौक, दिंडोरी नाका, गणेशवाडी, हिरावाडी, अयोध्यानगरी, भाजी मंडईसमोरील रस्ता, निमाणी बसस्थानकसमोरचा रस्ता, जुना आडगाव नाका रस्त्यावर तसेच हिरावाडी या भागात दरवर्षीच पावसाचे पाणी साचते. रस्त्यावर व मोकळ्या भूखंडावर पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागते.

महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना पुढच्या वर्षी पाणी साचणार नाही असे आश्वासन दिले जाते, मात्र पावसाळा सुरू झाल्यावर पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यास अधिकारी घटनास्थळी येण्याचे धाडस करत नाही. त्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यास नागरिकांना स्वतः नाइलाजास्तव साचलेल्या पाण्यात उतरून, तर कधी गटारावरील ढापे बाजूला सारण्यापासून नाल्यात साचलेला कचरा काढण्याचे काम करावे लागते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई करणे गरजेचे असते. पावसाळा सुरू व्हायला अजून १५ दिवस कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच नालेसफाई काम सुरू करणे गरजेचे आहे.