शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
3
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
5
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
6
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
7
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
8
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
9
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
10
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
11
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
12
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
13
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
14
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
15
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
16
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
17
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
18
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
19
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
20
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण

मागणी कमी झाल्याने औष्णिक वीजनिर्मितीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:15 IST

एकलहरे : राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने वीजनिर्मितीत घट झाली आहे. त्यामुळे नाशिकसह कोराडी, खापरखेडा, पारस, चंद्रपूर, भुसावळ येथील ...

एकलहरे : राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने वीजनिर्मितीत घट झाली आहे. त्यामुळे नाशिकसह कोराडी, खापरखेडा, पारस, चंद्रपूर, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती संचातून क्षमतेपेक्षा कमी वीज उत्पादन सुरू आहे, तर परळी येथील वीज उत्पादन शून्यावर आले आहे. उरण येथे गॅसपुरवठ्याअभावी संच बंद आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनची निकड, ऑक्सिजन प्लांटची उभारणी, त्यासाठी अखंडितपणे वीजपुरवठा करणे गरजेचे होते. उन्हाच्या वाढत्या उकाड्याने विजेचा घरगुती व कार्यालयांतील वापर, शेतीच्या खरीप हंगामाच्या कामांची लगबग यामुळे औद्योगिक, कृषी व घरगुती विजेचा वापर वाढल्याने गेल्या पंधरवड्यात विजेची मागणी २४ हजार मेगावॉटपर्यंत गेली होती. मात्र सद्याचे पावसाळी वातावरण, काही प्रमाणात लॉकडाऊनमुळे बंद असलेले उद्योग, घरगुती व शेतीसाठी लागणाऱ्या विजेची मागणी कमी होऊन १६ हजार मेगावॉटपर्यंत येऊन ठेपली आहे. त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर झाला आहे. दुसरीकडे पाण्याच्या पुरेशा साठ्याने जलविद्युत केंद्रांचा सपोर्ट मिळाल्याने औष्णिकची वीजनिर्मिती कमी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. काही ठिकाणी झिरो शेड्युल, कोळशाची समस्या, वार्षिक देखभाल दुरुस्ती या कारणांमुळे काही संच बंद ठेवावे लागत आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून मंगळवारी दुपारपर्यंत विजेची निर्मिती घटली आहे.

चौकट===

केंद्रनिहाय वीजनिर्मितीत घट

* नाशिक- १२३ (क्षमता ६३०)

* कोराडी-८५३ (क्षमता २४००)

* खापरखेडा- ६३० (क्षमता १३४०)

* पारस- १४० (क्षमता ५००)

* परळी- शून्य (क्षमता ११७०)

* चंद्रपूर- ११६८ (क्षमता २९२०)

* भुसावळ- ५३५ (क्षमता १२१०)

* उरण- शून्य (क्षमता ४३२)