शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत ओबीसींना आरक्षण न देण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:12 IST

नाशिक- राज्यातील महाविकास आघाडीतील ओबीसींना डिसेंबर २०२२ पर्यंत आरक्षण द्यायचे नसून त्यामुळेच ते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते ...

नाशिक- राज्यातील महाविकास आघाडीतील ओबीसींना डिसेंबर २०२२ पर्यंत आरक्षण द्यायचे नसून त्यामुळेच ते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या विषयावर मौन बाळगून आहेत. ओबीसींना आरक्षण मिळू नये यासाठी पवार यांच्याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे प्रयत्न करीत असून, तेच झारीतील शुक्राचार्य आहेत असा आराेप माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे सरचिटणीस चंद्रकांत बावनकुळे यांनी केला आहे.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत बावनकुळे यांनी मंगळवारी (दि.२०) भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ओबीसी आरक्षणावरून आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारने ओबीसी आयोग तयार केला. मात्र, या आयोगाचे कामकाजच सुरू केले नाही. या विषयात केंद्र शासनाचा कुठेही संबंध येत नाही, असे सांगून ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून ओबीसींचे आरक्षण टिकविले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप त्यांनी केला.

इन्फो...

...तर छगन भुजबळ यांना भाजप मदत करील

ओबीसी आरक्षणावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, भाजपने ओबीसी नेतृत्वाला नेहमीच प्रोत्सहन दिले आहे. राज्यातच नव्हे, तर देशातही सर्वाधिक ओबीसी नेत्यांना प्रतिनिधित्व दिले आहे. महाविकास आघाडीत मात्र तसे नाही, ओबीसींबाबत मंत्री विजय वडेट्टीवार बोलतात. छगन भुजबळ मोर्चे काढतात; पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ओबीसी आरक्षणावर बोलत नाहीत. भुजबळ यांनी ओबीसींसाठी पुढाकार घेतल्यास भाजप त्यांना मदत करील, असेही बावनकुळे म्हणाले.

यावेळी आ. देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो..

युवकांना भाजपशी जोडण्यासाठी ‘एक मतदान केंद्र, २५ तरुण’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी भाजयुमोच्या वतीने ‘युवा वॉरिअर्स’ तयार करण्यात येणार आहे आणि २५ लाख युवकांना पक्षाशी जोडण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत बावनकुळे व भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली. राज्यातील युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी युवा शक्ती संघटित करण्यात येत असून, डिसेंबर २०२१ पर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.