शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत ओबीसींना आरक्षण न देण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:12 IST

नाशिक- राज्यातील महाविकास आघाडीतील ओबीसींना डिसेंबर २०२२ पर्यंत आरक्षण द्यायचे नसून त्यामुळेच ते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते ...

नाशिक- राज्यातील महाविकास आघाडीतील ओबीसींना डिसेंबर २०२२ पर्यंत आरक्षण द्यायचे नसून त्यामुळेच ते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या विषयावर मौन बाळगून आहेत. ओबीसींना आरक्षण मिळू नये यासाठी पवार यांच्याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे प्रयत्न करीत असून, तेच झारीतील शुक्राचार्य आहेत असा आराेप माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे सरचिटणीस चंद्रकांत बावनकुळे यांनी केला आहे.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत बावनकुळे यांनी मंगळवारी (दि.२०) भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ओबीसी आरक्षणावरून आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारने ओबीसी आयोग तयार केला. मात्र, या आयोगाचे कामकाजच सुरू केले नाही. या विषयात केंद्र शासनाचा कुठेही संबंध येत नाही, असे सांगून ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून ओबीसींचे आरक्षण टिकविले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप त्यांनी केला.

इन्फो...

...तर छगन भुजबळ यांना भाजप मदत करील

ओबीसी आरक्षणावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, भाजपने ओबीसी नेतृत्वाला नेहमीच प्रोत्सहन दिले आहे. राज्यातच नव्हे, तर देशातही सर्वाधिक ओबीसी नेत्यांना प्रतिनिधित्व दिले आहे. महाविकास आघाडीत मात्र तसे नाही, ओबीसींबाबत मंत्री विजय वडेट्टीवार बोलतात. छगन भुजबळ मोर्चे काढतात; पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ओबीसी आरक्षणावर बोलत नाहीत. भुजबळ यांनी ओबीसींसाठी पुढाकार घेतल्यास भाजप त्यांना मदत करील, असेही बावनकुळे म्हणाले.

यावेळी आ. देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो..

युवकांना भाजपशी जोडण्यासाठी ‘एक मतदान केंद्र, २५ तरुण’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी भाजयुमोच्या वतीने ‘युवा वॉरिअर्स’ तयार करण्यात येणार आहे आणि २५ लाख युवकांना पक्षाशी जोडण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत बावनकुळे व भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली. राज्यातील युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी युवा शक्ती संघटित करण्यात येत असून, डिसेंबर २०२१ पर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.