शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शंभर कोटी परत घेण्याबाबत २ जुलैस फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:12 IST

या बैठकीत कंपनीच्या अर्थसंकल्पासह अन्य अनेक विषय तहकूब करण्यात आले असले तरी गावठाण भागातील जलवाहिन्यांचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय ...

या बैठकीत कंपनीच्या अर्थसंकल्पासह अन्य अनेक विषय तहकूब करण्यात आले असले तरी गावठाण भागातील जलवाहिन्यांचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे दीड कोटी रुपये या कामासाठी खर्च येणार आहेत.

कोरोना संकटामुळे महापालिकेच्या उत्पन्न वसुलीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. त्यातच यंदाचे इलेक्शन वर्ष असल्याने विकासकामे होत नसल्याने नगरसेवकांची ओरड सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी कंपनीला दिलेले शंभर कोटी रुपये परत घेण्याची मागणी करणारा ठराव महासभेत मंजूर केला असून, महापौरांनी तसे पत्र दिले आहे. त्यासह स्मार्ट सिटी कंपनीच्या अन्य कामांवर चर्चा करण्यासाठी कंपनीची त्रैमासिक बैठक शनिवारी (दि.१९) पार पडली. मात्र, कंपनीचे संचालक असलेले महापौर सतीश कुलकर्णी या बैठकीस उपस्थित नसल्याने आयुक्त कैलास जाधव यांना निधी परत देण्याबाबत बाजू मांडण्यास अध्यक्ष कुंटे यांनी सांगितले. मात्र, महासभेचा ठराव असल्याने महापौर याविषयावर बाजू मांडतील, असे आयुक्तांनी सांगितले आणि महापौरच २ जुलै राेजी हा विषय मांडतील, असे सांगितल्याने आता या विषयावर चर्चा टळली आहे.

यावेळी सभागृह नेता म्हणून सतीश सोनवणे यांच्याऐवजी कमलेश बेाडके यांची संचालकपदी नियुक्ती करणे, कंपनीचे त्रैवार्षिक खर्च यास मंजुरी देण्यात आली. मात्र, कंपनीचे सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या अंदाजपत्रक, हरित क्षेत्र विकास प्रकल्पाची सद्य:स्थिती यासह अन्य विषय तहकूब करण्यात आले.

या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, कंपनीचे संचालक तुषार पगार, भास्कर मुंढे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

इन्फो..

रस्तेप्रकरणी अहवाल द्यावा

या बैठकीस गावठाणातील रस्ते आणि पाइपलाइनच्या कामाविषयी जेारदार चर्चा झाली. गुरुमित बग्गा आणि शाहू खैरे यांनी गावठाणातील खोदकाम अत्यंत चुकीच्या वेळी केले, त्यामुळे नागरिकांना आणि व्यावसायिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे, अशा तक्रारी करण्यात आल्या. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांनी संयुक्त पाहणी करावी आणि तसा अहवाल सादर करण्यास सांगावे, अशी मागणी बग्गा आणि खैरे यांनी केली.

इन्फो..

शहरातील स्मार्ट पार्किंगचा ठेका ज्या कंपनीला देण्यात आला आहे, त्यांनी कोरोनामुळे नुकसान झाल्याचा दावा करीत महापालिकेला देय रक्कम कमी करावी तसेच पाच वर्षांसाठी ठेका द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यावर अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी कोरोनाकाळातील आर्थिक नुकसानीबाबत काय निर्णय घ्यावेत याबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केली असून, त्यात ठेकेदाराचे दावे बसतात किंवा नाही याची तपासणी करून २ जुलै रोजी निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.