शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पिळकोस गावाला वायरमन देण्याचा निर्णय

By admin | Updated: August 29, 2016 23:54 IST

पिळकोस गावाला वायरमन देण्याचा निर्णय

पिळकोस : एक वर्षापासून येथे वायरमन नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पिळकोस गावाला वायरमन देण्याचा निर्णय घेत वायरमनची नेमणूक केल्याने पिळकोस ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. कळवण तालुक्यातील पिळकोस येथे एक वर्षापासून वायरमन नसल्यामुळे शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत होती व विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. वायरमन नसल्यामुळे त्याची कामे गावातील शेतकऱ्यांना करावी लागत होती. वायरमन नसल्यामुळे शेतकऱ्यांना विजेच्या खांबावर स्वत: चढून तुटलेल्या तारा जोडाव्या लागत असल्यामुळे मागील वर्षी ललित मोहन वाघ, किरण शांताराम जाधव हे शेतकरी रोहित्राचा डीओ टाकत असताना त्यांना विजेच्या उच्च दाबाचा मोठा धक्का लागल्याने ते रोहित्रावरून खाली पडून जखमी झाले होते.पिळकोस गावाला कायमस्वरूपी निवासी वायरमन मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी एक वर्षापासून जोर धरत होती. परंतु शेतकऱ्यांच्या या मागणीला महावितरण कंपनीचे अधिकारी कुठलीच दाद देत नव्हते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली व त्यांनी पिळकोस गावासाठी वायरमनची नेमणूक केली. यामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांचा व गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला असून, आता रोहित्रावरील दुरुस्तीची कामे शेतकऱ्यांना करावी लागणार नसल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिळकोस गाव व शिवारात कृषिपंपासाठी एकून साठ रोहित्रे असून, परिसरातील विद्युतवाहक तारा या जुनाट झाल्याने त्या हवा आल्याने, पाऊस पडल्याने तुटत असतात. पिळकोस गाव हे ठेंगोडा सब डिव्हिजनवरील शेवटच्या टोकाचे गाव असल्यामुळे दहा वर्षांपासून येथे अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे पिळकोस शिवारातील रोहित्रात बिघाड होणे, फ्युज जाणे, डीओ जाणे, रोहित्राची केबल जळणे, वीजतारा झाडांना लागून फ्वालट होणे, रोहित्रामधून शेतकऱ्यांच्या कृषिपंपापर्यंत तिन्ही फेजचा सुरळीत पुरवठा न होणे, रोहित्रावर लोड आल्यावर रोहित्राची बुशिंग जळणे व कायम रोहित्र जळणे, त्यामुळे शेतकऱ्यांचे कृषिपंप जळणे असे प्रकार रोज शिवारात घडत असतात. वायरमन नसल्यामुळे ही सर्व कामे शेतकरी करत होती. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत होते व शेतीपिकांचेही नुकसान होत होते व शेतकऱ्याला विजेचा धक्काही खावा लागत होता. तब्बल एक वर्षानंतर पिळकोसला पुन्हा वायरमनची नेमणूक झाल्यामुळे आता परिसरातील वीजपुरवठा सुरळीत टिकून राहील व यापुढे कुठल्याही शेतकऱ्याला विजेचा धक्का बसणार नाही, अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.पिळकोस गावाला एक वर्षानंतर पुन्हा वायरमनची नेमणूक झाल्यामुळे उपसरपंच साहेबराव रेवबा जाधव, शेतकरी संघटनेचे नेते शांताराम जाधव, भाजपा उपाध्यक्ष राहुल सूर्यवंशी, रवींद्र वाघ, साहेबराव जाधव, निवृत्ती जाधव, हंसराज वाघ, दादाजी जाधव, केवळ वाघ, मुरलीधर वाघ, उत्तम मोरे, रामदास अहेर, मंगेश अहेर, राहुल अहेर यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर )