शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
2
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
3
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
4
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
5
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
6
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
7
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
8
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
9
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
10
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
12
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
13
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
14
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
15
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
16
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
17
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
18
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
19
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
20
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी

पिळकोस गावाला वायरमन देण्याचा निर्णय

By admin | Updated: August 29, 2016 23:54 IST

पिळकोस गावाला वायरमन देण्याचा निर्णय

पिळकोस : एक वर्षापासून येथे वायरमन नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पिळकोस गावाला वायरमन देण्याचा निर्णय घेत वायरमनची नेमणूक केल्याने पिळकोस ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. कळवण तालुक्यातील पिळकोस येथे एक वर्षापासून वायरमन नसल्यामुळे शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत होती व विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. वायरमन नसल्यामुळे त्याची कामे गावातील शेतकऱ्यांना करावी लागत होती. वायरमन नसल्यामुळे शेतकऱ्यांना विजेच्या खांबावर स्वत: चढून तुटलेल्या तारा जोडाव्या लागत असल्यामुळे मागील वर्षी ललित मोहन वाघ, किरण शांताराम जाधव हे शेतकरी रोहित्राचा डीओ टाकत असताना त्यांना विजेच्या उच्च दाबाचा मोठा धक्का लागल्याने ते रोहित्रावरून खाली पडून जखमी झाले होते.पिळकोस गावाला कायमस्वरूपी निवासी वायरमन मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी एक वर्षापासून जोर धरत होती. परंतु शेतकऱ्यांच्या या मागणीला महावितरण कंपनीचे अधिकारी कुठलीच दाद देत नव्हते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली व त्यांनी पिळकोस गावासाठी वायरमनची नेमणूक केली. यामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांचा व गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला असून, आता रोहित्रावरील दुरुस्तीची कामे शेतकऱ्यांना करावी लागणार नसल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिळकोस गाव व शिवारात कृषिपंपासाठी एकून साठ रोहित्रे असून, परिसरातील विद्युतवाहक तारा या जुनाट झाल्याने त्या हवा आल्याने, पाऊस पडल्याने तुटत असतात. पिळकोस गाव हे ठेंगोडा सब डिव्हिजनवरील शेवटच्या टोकाचे गाव असल्यामुळे दहा वर्षांपासून येथे अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे पिळकोस शिवारातील रोहित्रात बिघाड होणे, फ्युज जाणे, डीओ जाणे, रोहित्राची केबल जळणे, वीजतारा झाडांना लागून फ्वालट होणे, रोहित्रामधून शेतकऱ्यांच्या कृषिपंपापर्यंत तिन्ही फेजचा सुरळीत पुरवठा न होणे, रोहित्रावर लोड आल्यावर रोहित्राची बुशिंग जळणे व कायम रोहित्र जळणे, त्यामुळे शेतकऱ्यांचे कृषिपंप जळणे असे प्रकार रोज शिवारात घडत असतात. वायरमन नसल्यामुळे ही सर्व कामे शेतकरी करत होती. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत होते व शेतीपिकांचेही नुकसान होत होते व शेतकऱ्याला विजेचा धक्काही खावा लागत होता. तब्बल एक वर्षानंतर पिळकोसला पुन्हा वायरमनची नेमणूक झाल्यामुळे आता परिसरातील वीजपुरवठा सुरळीत टिकून राहील व यापुढे कुठल्याही शेतकऱ्याला विजेचा धक्का बसणार नाही, अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.पिळकोस गावाला एक वर्षानंतर पुन्हा वायरमनची नेमणूक झाल्यामुळे उपसरपंच साहेबराव रेवबा जाधव, शेतकरी संघटनेचे नेते शांताराम जाधव, भाजपा उपाध्यक्ष राहुल सूर्यवंशी, रवींद्र वाघ, साहेबराव जाधव, निवृत्ती जाधव, हंसराज वाघ, दादाजी जाधव, केवळ वाघ, मुरलीधर वाघ, उत्तम मोरे, रामदास अहेर, मंगेश अहेर, राहुल अहेर यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर )