शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

बाजार समित्यांचे विकेंद्रीकरण अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:14 IST

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने बुधवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व ...

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने बुधवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील शेतीमाल लिलावाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समित्यांनी गावनिहाय गट करून मध्यवर्ती ठिकाणी विक्री व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांना दिल्या आहेत मात्र व्यवहारिकदृष्ट्या ते शक्य नसल्याने सर्वच बाजार समित्यांनी उपनिबंधकांच्या पत्राला वाटाण्याच्या अक्षदा लावत आपापल्यापरिने माल खरेदी विक्रीची व्यवस्था केली आहे. ज्या शेतकऱ्यांना आपला माल विकावयाचा आहे. त्यांनी बाजार समितीच्या अधिकृत व्यापाऱ्यांशी संपर्क साधून माल विक्री करण्याची परवानगी देण्यात आली असून व्यापाऱ्यांच्या खळ्यावर बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित रहाणार असल्याने या व्यवहाराला बाजार समितीची मान्यता असणार आहे. यामुळे नाशवंत माल शेतकरी व्यापाऱ्यांपर्यंत घेऊन जात असल्याचा दावा बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

कोट-

बाजार समितीचे विकेंद्रीकरण शक्य नसल्याने मुख्य आवारात कामकाज बंद असले तरी व्यापाऱ्यांच्या खळ्यावर बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शेतीमाल विक्रीचे व्यवहार होत आहेत. व्यापाऱ्यांच्या खळ्यावर कांदा येत आहे. - अशोक देसले, सचिव, मालेगाव बाजार समिती

कोट-

लॉकडाऊनमध्ये फक्त भाजीपाला आणि लाल कांदा यांचाच प्रश्न निर्माण होऊ शकतो, पण बाजार समितीने व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर माल विक्रीची व्यवस्था केलेली असल्यामुळे फारसी समस्या निर्माण होणार नाही. हा व्यावहार पूर्णपणे रोख स्वरूपात असल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. - सुवर्णा जगताप, चेअरमन, लासलगाव बाजार समिती

कोट-

नाशिक बाजार समितीला विकेंद्रीकरण करणे शक्य नाही. शिवाय व्यापाऱ्यांकडेही मोठ्या जागा नसल्यामुळे मालाची पॅकिंग आणि इतरही समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यामुळे बाजार समितीचे व्यावहार बंदच आहेत. काही व्यापारी शिवार खरेदी करत आहेत. मुख्य आवार सोडून दुसरीकडे जागा घेतली तर तेथेही गर्दी होऊ शकते. शिवाय हमाल, मापारी, इतर कर्मचारी यांचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. - अरुण काळे, सचिव, नाशिक बाजार समिती