शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

त्र्यंबकेश्वर शहरात दिवसाआड पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST

त्र्यंबकेश्वर : शहरात यांत्रिक बिघाडामुळे अंबोली लघुपाट धरण ओव्हरफ्लो झाले असताना शहरात तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत ...

त्र्यंबकेश्वर : शहरात यांत्रिक बिघाडामुळे अंबोली लघुपाट धरण ओव्हरफ्लो झाले असताना शहरात तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बेझे येथील गौतमी प्रकल्प जवळपास ४५ टक्के भरला असताना त्र्यंबकेश्वर शहरातील श्री निरंजनी अखाडा परिसरातील आनंद आखाडा, कैलासराजा नगर, तलाठी काॅलनी, श्रीस्वामी समर्थ केंद्र ,गुळवेवाडी, पेगलवाडी या परिसरातील रहिवासी यांना गेल्या सात दिवसांपासून पाणीच नसल्याने इतरत्र जलाशयातून पाणी भरून नेण्याची वेळ आली आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी परिस्थिती असताना पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर नगरपरिषद गंभीर नाही. याचेच सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वास्तविक अशा परिस्थितीत युध्द पातळीवर मोटार दुरुस्त करणे गरजेचे असतांना कासवगतीने व बेफिकिरीने मोटार दुरुस्तीला टाकण्यात आली ती आता दुरुस्त होऊन झाली की नाही याबाबत कोणताच पाठपुरावा केलेला नाही.

अखेर सोमवारी (दि.२६) सायंकाळी मोटार दुरुस्त करुन आणल्याचे समजले. तोपर्यंत ज्या रहिवासीयांना सात-आठ दिवस पाणीच न आल्याने ते लोक विहिरी, झरे यांचा वापर करीत असल्याचे पहावयास मिळाले. पावसाळी वातावरण त्यात अशुद्ध पाणी पिल्याने काहींना सर्दी, खोकला, जुलाब असा त्रास होत आहे. त्यामुळे अनेकांच्या डॉक्टरांकडे फेऱ्या वाढल्या आहेत. वास्तविक नगरपरिषदेत अहिल्या धरण, अंबोली धरण, बेझे येथील गौतमी प्रकल्पातून नगरपरिषद पाणी उचलत असताना त्र्यंबक पालिकेला आपल्या पदरी एखादी दोन मोटार जादा ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात अशा हलगर्जीपणाबद्दल नागरिकांनी नाराजी बोलून दाखविली.