शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

दातार जेनिटिक्स लॅबचा जिल्हाधिकाऱ्यांवर ५०० काेटींच्या मानहानीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:17 IST

नाशिक: शासकीय टेस्टींग लॅबच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात आलेल्या दातार जेनेटिक्स लॅबने ...

नाशिक: शासकीय टेस्टींग लॅबच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात आलेल्या दातार जेनेटिक्स लॅबने जिल्हाधिकाऱ्यांवर ५०० कोटी रुपयांचा दावा ठोकण्याचा इशारा देत कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पत्रकात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप करीत लॅबने अहवालाची पुनर्तपासणी करण्याची तयारी दर्शविली असून अहवालात विसंगती सापडली नाहीतर जिल्हाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे थेट आव्हानच दिले आहे.

दातार जेनेटिक्स लॅबमधील अहवालाची शासकीय लॅबमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये विसंगती आढळल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दातार लॅबला पुढील आदेशापर्यंत कोरोना स्वॅब टेस्टींग करण्यास बंदी घातली आहे. त्यांच्या या कारवाईवर आक्षेप घेत दातार लॅबने जिल्हाधिकाऱ्यांवरच मानहानीचा दावा ठोकण्याचा इशाारा दिला आहे. टेस्टींग बंद करण्याचा निर्णय हा अन्यायकारक असल्याचा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा संधी दिली नसल्याचा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने ज्या प्रयोगशाळेत आमच्या अहवालांची पुनर्चाचणी केली ती प्रयोगशाळा एनएबीएल किंवा आयसीएमआर प्रमाणित होती का, असा सवाल उपस्थित करीत आपल्या प्रयोगशाळेमध्ये आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसारच सर्व चाचण्या केल्या जात होत्या आणि आजपर्यंत त्यामध्ये कोणतीही विसंगती आढळली नसल्याचा दावा दातार लॅबने केला आहे.

नाशिकमध्ये जेंव्हा कोविड१९ ची चाचणी कोठेही होत नव्हती तेंव्हा कंपनीने प्रशासनाच्या विनंतीवरून नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये उपकरणे तसेच कुशल मनुष्यबळ देऊन चाचणी सुरू केली. यासाठी कोणताही मोबदला घेतलेला नाही. असे असूनही जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही सूचना ने देता कोविड चाचणी करण्यास प्रतिबंध केला आहे. त्यांच्या या आदेशामुळे संस्थेची प्रतीमा मलीन झाल्याने मानहानीचा दावा करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, लॅबमधील अहवाल जिल्हा प्रशासनाला अडचणीचे वाटत असल्याने यापुढे कोविडची चाचणी कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दातार जेनेटिक्सने म्हटले आहे.

--कोट--

व्हॉटसअपवर मला याबाबतचे वाचायला मिळाले. हा दबावतंत्राचा भाग आहे. आदेशात दिलेल्या निर्देशाचे पालन न करता अशा प्रकारे विषय भरकटवणे व दबाव निर्माण करणे निश्चितच अनुचित आहे. एकंदरीत कोरोनाच्या काळात अनेक जण निरलसपणे काम करीत असताना काहीवेळा आस्थापनाबाबत संभ्रम निर्माण झाल्याने त्या-त्यावेळी त्या-त्या आस्थापनांवर राज्यभर कारवाई देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे असा संभ्रम निर्माण झाला तर विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून तो दूर करणे हे अपेक्षित आहे. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.